नवी दिल्ली:राणा दाम्पत्यावर पूर्ण अन्याय असल्याचा आरोप करून आठवले यांनी एएनआयला सांगितले की नवनीत राणा या महाराष्ट्राच्या अमरावती येथील खासदार आहेत, ज्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यावर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आणि २४ एप्रिल रोजी त्यांना १४ दिवसांसाठी तुरुंगात पाठवले होते.
Athawale On Rana Couple : राणा दाम्पत्यावर दलित असल्यामुळे अन्याय - केंद्रीय मंत्री रामदास आठवले - नवनीत आणि रवी राणा
खासदार-आमदार असलेल्या राणा जोडप्याला पूर्ण पाठिंबा (Full support to the Rana couple) देण्याचे आश्वासन देत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रामदास आठवले (Union Minister Ramdas Athavale) यांनी आरोप केला की महाराष्ट्र सरकार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर अन्याय करत आहे कारण ती दलित (Injustice as Rana couple is Dalit ) समाजाची आहे.
![Athawale On Rana Couple : राणा दाम्पत्यावर दलित असल्यामुळे अन्याय - केंद्रीय मंत्री रामदास आठवले Ramdas Athawale](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15245377-1011-15245377-1652174169862.jpg)
रामदास आठवलें
"नवनीत राणा यांच्यावर महाराष्ट्र सरकारने मोठा अन्याय केल्यामुळे मी नेहमीच त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी याबाबत लोकसभा अध्यक्षांची भेटही घेतली होती आणि त्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती, आठवले म्हणाले, हनुमान चालिसा वाचण्याच्या नावाखाली देशद्रोहाचा गुन्हा लावू नये. देशद्रोहाचा आरोप असलेल्या महाराष्ट्र सरकारने हा गुन्हा केला आहे. नवनीत आणि रवी राणा (Navneet and Ravi Rana) यांना न्याय मिळाला पाहिजे.
Last Updated : May 10, 2022, 4:03 PM IST