महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 31, 2023, 11:12 AM IST

ETV Bharat / bharat

Indore Temple Accident : मंदिर दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू, लष्कराने हाती घेतले बचावकार्य

इंदूरमधील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात गुरुवारी रामनवमीच्या दिवशी झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. रात्री उशिरा लष्कराने बचावकार्य हाती घेतले. त्यानंतर पहाटे 2 वाजेपर्यंत विहिरीतून आणखी 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आज मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली.

Indore Temple Accident
इंदूर मंदिर दूर्घटना

इंदूर मंदिर दूर्घटना

इंदूर : बेलेश्वर महादेव मंदिरात झालेल्या भीषण अपघाताने मध्य प्रदेशसह संपूर्ण देश हादरला आहे. मंदिराच्या विहिरीतून अजूनही मृतदेह बाहेर काढले जात आहेत. गुरुवारी रात्री उशिरा 11 वाजता लष्कराने घटनेचा पदभार स्वीकारला. शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लष्कराचे जवान विहिरीतून आणखी काही मृतदेह बाहेर काढण्यात गुंतले होते. मात्र विहीर खोल असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. इंदूरच्या आयुक्तांनी आत्तापर्यंत या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आज इंदूरला भेट दिली.

16 जण रुग्णालयात दाखल :इंदूरचे विभागीय आयुक्त डॉ. पवन देव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाच्या पथकासह, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि पोलिसांची टीम बचावकार्यात गुंतलेली आहे. याशिवाय लष्कराचे 75 जवानही बचावकार्यात गुंतले आहेत. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीतून 18 जणांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी 2 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय 16 लोक अजूनही ऍपल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. शोध मोहिमेत आतापर्यंत 35 मृतदेहांची ओळख पटली असून, अपघातातील मृतांची संख्या 35 वर पोहोचली आहे.

मुख्यमंत्री इंदूरला पोहोचले : ही विहीर सुमारे 40 फूट खोल आहे. बचावकार्य सातत्याने सुरू आहे. पण पाण्याची पातळी वारंवार वाढत असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे बचावकार्य कधी पूर्ण होईल याबाबत काहीही सांगता येणार नाही. अपघातानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज सकाळी साडेनऊ वाजता इंदूरला पोहोचले आहेत. ते प्रथम मंदिर दुर्घटनेतील जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयात भेट घेणार आहेत. त्यानंतर ते घटनास्थळी भेट देतील. आज राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा देखील इंदूरला पोहोचून जखमींची भेट घेणार आहेत. इंदूरमधील या घटनेनंतर संपूर्ण शहरात शोकाचे वातावरण आहे. या घटनेमुळे शहरातील अनेक व्यापारी संघटनांनी अर्धा दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्या चेंबर ऑफ कॉमर्स व्यतिरिक्त गुजराती समाज आणि इतर व्यापारी संघटना शहरातील आपली प्रतिष्ठाने दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवणार आहेत.

असा घडला अपघात : इंदूरच्या स्नेह नगर येथील बेलेश्वर मंदिरात गुरुवारी सकाळी रामनवमी उत्सवानिमित्त हवनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने लोक मंदिरात पोहोचले होते. दरम्यान, अचानक विहिरीचे छत गर्दीचा दबाव सहन करू न शकल्याने मोठा आवाज करत कोसळले. विहिरीचे छत कोसळताच वर बसलेले लोक 40 फूट खोल विहिरीत पडले. धक्कादायक म्हणजे, पायरीच्या वर एक लोखंडी शेड आणि लोखंडी रेलिंग होती. त्यावर फरशा लावण्यात आल्या. यामुळे आपण जिथे उभे आहोत तिथे एक खोल विहीर आहे हेही लोकांना माहित नव्हते.

मृतांच्या नातेवाईकांनी केले अवयव दान : मृतांच्या नातेवाईकांच्या इच्छेनुसार बहुतांश कुटुंबांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दक्षा पटेल, इंद्र कुमार, भूमिका खानचंदानी, लक्ष्मी पटेल, मधु भाम्मानी, जयंतीवाई, भारती कुकरेजा, कनक पटेल यांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी इंद्रकुमार भूमिका खानचंदानी आणि जयंतीबाई यांच्या नातेवाइकांनी त्वचा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :Indore Temple Accident : मंदिर दुर्घटनेत 35 जणांनी गमावला जीव, जाणून घ्या इनसाईड स्टोरी

ABOUT THE AUTHOR

...view details