नवी दिल्ली- देशातील कोरोना परिस्थिती सध्या गंभीर बनली असून दिवसा २ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. काही राज्यांमध्ये संचारबंदी, जमावबंदी किंवा टाळेबंदीचा पर्याय अवलंबला जात आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेची (काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन) १० वी आणि १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या देशभरात वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 4 मेपासून सुरू होणारी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेचे (सीआयसीएसई) मुख्य कार्यकारी व सचिव गॅरी अरथून म्हणाले.