महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीलंकेतला हॉटेल व्यावसायिक केरळमध्ये येऊन विकतोय पापड.. 'असे' आहे कारण - श्रीलंकेत हॉटेलचा व्यवसाय

श्रीलंकेत १४ वर्षे हॉटेलचा व्यवसाय करणारा एक व्यावसायिक उदरनिर्वाहासाठी आता केरळमध्ये आला आहे. श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणीमुळे त्याचा व्यवसाय डबघाईस आला असून, आता त्याच्यावर केरळमध्ये पापड विकण्याची वेळ आली ( A Sri Lankan hotelier is selling papad in Kerala ) आहे.

hotel businessman in Sri Lanka for 14 years, Shafi now sells pappad in Kasaragod to live
श्रीलंकेतला हॉटेल व्यावसायिक केरळमध्ये येऊन विकतोय पापड.. 'असे' आहे कारण

By

Published : Jul 16, 2022, 9:07 PM IST

कासारगोड ( केरळ ) : "गॅस नव्हता, एक लिटर पेट्रोल मिळवण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागली, जनतेच्या हातात पैसे नाहीत, ते नरकासारखे जीवन जगत आहेत," असे सांगताना श्रीलंकेतील हॉटेल व्यावसायिक अब्दुल्ला मोहम्मद शफी हे थरथर कापतात. श्रीलंकेच्या आर्थिक पतनानंतर त्याला श्रीलंका सोडावी लागली. शफी गेल्या 14 वर्षांपासून श्रीलंकेत आरामदायी जीवन जगत होते. कोलंबोच्या उत्तर मध्य भागात तो हॉटेल चालवत होता. अवघ्या तीन महिन्यांत सर्व काही उलटले आणि शेवटी त्याला तेथून कासारगोड येथील आपल्या मूळ गावी पळून जावे लागले. शफी आता उदरनिर्वाहासाठी पापड विकतो ( A Sri Lankan hotelier is selling papad in Kerala )आहे.

"आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकासाठी वापरत असलेला LPG मिळणं खूप अवघड होतं. रेस्टॉरंटला भेट देणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली. कच्च्या मालाची किंमत गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे रेस्टॉरंट बंद करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी मित्रासोबत एक मेडिकल स्टोअर सुरू केले, पण तेही टिकले नाही," शफीने अशा शब्दात परिस्थितीचे वर्णन केले.

श्रीलंकेतून सर्व काही मागे टाकून शफी जेव्हा परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते. त्याच्या मित्राने पापड व्यवसाय सुचवला आणि शफीने दुसरा विचार केला नाही. तो आता कासारगोड येथील चेम्मनाडमध्ये पापड व्यवसाय करतो आहे.

तो म्हणतो की श्रीलंकेतील त्याचे मित्र अजूनही त्याला फोन करतात. लंकेतील परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे ते म्हणतात. अनेकांना रोजचे अन्न मिळणेही कठीण झाले आहे. श्रीलंकेत अनेक केरळी आहेत आणि सर्वांना त्रास होत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :Emergency in Sri Lanka : राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर परिस्थिती बिघडली, हजारो आंदोलक संसदेत पोहोचले

ABOUT THE AUTHOR

...view details