महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 15, 2021, 6:37 AM IST

Updated : Aug 15, 2021, 12:57 PM IST

ETV Bharat / bharat

#IndiaAt75 : 15000 फुटांवर #Adikailash च्या पायथ्याशी फडकावला तिरंगा

narendra modi
नरेंद्र मोदी

12:53 August 15

लाल किल्ल्यात ड्रोनद्वारे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून डीआरडीओची अँटी ड्रोन सिस्टीम लावण्यात आले.

12:30 August 15

जम्मू काश्मीरमध्ये फडकला तिरंगा...

12:15 August 15

भारत-पाकिस्तान दरम्यान मिठाईचे वाटप.

11:27 August 15

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या निवासस्थानी ध्वजारोहण करत सर्व देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

11:26 August 15

#IndiaAt75  निमित्त 15000 फुटांवर #Adikailash च्या पायथ्याशी जोलीखांग येथे ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित केला. 

11:25 August 15

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमधील पँगोंग त्सो सरोवरानजिक स्वातंत्र्य दिन साजरा केला.  

11:24 August 15

भारतीय नौदलाच्या आयएनएस रणविजय आणि आयएनएस कोरावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

11:24 August 15

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कर्नाटक सरकारने अमृत क्रीडा दत्तक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्यातील 75 प्रतिभावंत खेळाडूंना याद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

11:24 August 15

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तसंच देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

11:24 August 15

भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजप मुख्यालयात ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

11:24 August 15

पूर्व सेक्टरमधील सर्वात उंचावरील पास असलेल्या डोंक्याला पास इथे सैन्यदलाच्या वतीने राष्ट्रध्वज फडकाविण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते भारत भूषण बाबू यांनी सांगितले. 18500 फुट उंचीवर हा पास आहे.

08:52 August 15

देशातील जलसंरक्षणाचे अभियानास बळ देण्यासाठी समुद्र किनारे स्वच्छ ठेवावे, नदीमध्ये कचरा न टाकावा. कोटी कोटी भारतीयांच्या प्रयत्नातून अमृतकुंभ बनवूया.

08:50 August 15

भारत बदलत आहे. भारत कठीण निर्णयही घेऊ शकतो. दुसऱ्या विश्वयुद्दानंतर वैश्विक संबंधांचे स्वरुप बदलले. कोरोनाकाळात जगाने देशाचे प्रयत्न पाहिले. आज जग भारताला एका नव्या दृष्टीने पाहत आहे. एक आतंकवाद आणि दुसरा विस्तारवाद. भारत दोन्ही समस्यांशी लढत आहे. मोठ्या हिमताने त्याला उत्तर देत आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात भारताला आणखी प्रबळ बनविण्यासाठी देश प्रयत्नरत आहे. आम्ही त्यात कोणतीही कसर सोडणार नाही. 

08:50 August 15

सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकचाही त्यांनी उल्लेख केला. 

08:48 August 15

कलम 370, जीएसटी, वन रँक वन पेंशन असे विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. अशा विषयांना सोडविण्याचे काम आम्ही केले. 

08:45 August 15

नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा

2030 नेट झिरो कार्बन एमिटर बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी मिशन सर्क्युलर इकॉनॉमीवर बल देत आहेत. आज जी 20 समूह देशांमध्ये भारत एकमात्र देश आहे जो आपले क्लायमेट गोलच्या दिशेने प्रयत्न करत आहे. आमचे हे प्रयत्न जगालाही विश्वास देत आहेत. भारत आज जे कार्य करत आहे त्यात क्लायमेट जंप देणारे, ग्रीन हायड्रोजनचा हब बनविण्यासाठी नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा करत आहे. ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून ग्रीन जॉब मिळणार.

08:42 August 15

भारत आज ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबी नाहीये. ऊर्जेच्या आयातासाठी 12 लाख कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च केले जातात. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी देशाला हे संकल्प घ्यायला हवा की, भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्ष होण्याआधी आपण देशाला ऊर्जाक्षेत्रामध्ये स्वावलंबी बनवू. यादिशेने प्रयत्न सुरू आहेत.  

08:40 August 15

देशातील मुलींनी देशाचा गौरव वाढवला आहे. आपल्याला हे सुनिश्चित करायचे आहे की, रस्त्यापासून ऑफिसपर्यंत महिलांमध्ये सम्मानाचा, सुरक्षिततेचा भाव असावा. यासाठी नागरिकांना, पोलिसांना, प्रशासनाला आपली प्रतिबद्धता वाढवायला हवी. देशात सर्वच सैनिकी शाळेत आता मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. 

08:39 August 15

जीवनात संपूर्णतेसाठी खेळ हा फार महत्त्वाचे आहे. एक वेळ होती, खेळ मुख्यप्रवाहात नव्हतो. मात्र, आता फिटनेस, खेळाला घेऊन एक जागरुकता निर्माण झाली आहे. यासाठी देशात यासाठी व्यापक प्रयत्न करायले हवेत.  

08:36 August 15

सर्वात मोठा महत्त्वाचे आहे ती शिक्षणव्यवस्था. नवीन शिक्षा नितीच्या माध्यमातून भाषेमुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होणार नाही. मातृभाषांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. त्यांच्या क्षमतेसोबत न्याय होईल. नवीन शिक्षानितीसोबत भाषा हे गरीबीच्या विरोधात लढाईचे माध्यम आहे. देशाने पाहिले आहे की, भाषा अडचणीचा मुद्दा नाही बनला. याचा परिणाम देशातील युवक खेळत आहे. ही परिणाम आता दुसऱ्या क्षेत्रातही पाहायला मिळणार आहे. 

08:33 August 15

अनेक क्षेत्रांमध्ये नियमांना आम्ही रद्द केले आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसाठी हे महत्त्वाचे आहे. करासंबंधी सुविधेसाठी हे महत्त्वाचे आहे. मी आग्रह करतो की, केंद्र असो की, राज्य सर्व सरकार्यालयांना आवाहन करतो की, प्रत्येक नियम नागरिकांना त्रासदायक असेल तिला दुर करावी. याच विचाराने सरकारने नोकरशाहीत पीपल सेंट्रीक अप्रोच वाढविण्यासाठी मिशन कर्मयोगी आणि कॅपॅसिटी बिल्डिंग कँपेनही सुरू केले. 

08:29 August 15

मोठे निर्णय घेण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते. नवीन नियमांना लागू करण्यासाठी गुड आणि स्मार्ट गव्हर्नंसची आवश्यकता असते. नागरिकांना जे काही मिळायला हवे, ते शेवटच्या घटकांपर्यंत कोणत्याही समस्येविना मिळावे, यासाठी सरकारी प्रक्रियांचा विनाकारण दखल बंद करणे गरजेचे आहे. मागील सात वर्षात यासाठी प्रयत्नही केले गेले आहेत. अनावश्यक कायदे रद्द करण्यात आले. हे त्याचेच उदाहरण आहे. सरकारने 15 हजारहून अधिक कम्पायंसेसला रद्द केले.

08:26 August 15

आपण पाहिले की, कोरोनाच्या या संकटात हजारो नवीन स्टार्टअप्स सुरू झाले. याची मार्केट व्हॅल्यू हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे. हे आपल्या युनिक आयडियाच्या माध्यमातून जगात आपली ओळख निर्माण करत आहेत. 

08:26 August 15

भारतात ज्या वस्तू आपण तयार करू त्या जागतिक स्पर्धेत टिकल्या पाहिजे या दिशेने प्रयत्न करायला हवेत. जे उत्पादन परदेशात विकले जाते ते फक्त तुमचेच नाही तर त्यासोबत भारताची प्रतिष्ठा प्रणाला लागलेली असते. उद्योजकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सरकार तुमच्यासोबत आहे.

08:25 August 15

भारतात येत्या काळात प्रधानमंत्री गतीशक्ती योजना लाँच करण्यात येणार आहे. 100 लाख कोटींची योजना लाखो तरुणांसाठी नोकरीची संधी घेऊन येणार आहे. भविष्यातील सर्व अडचणींवर यातून मात करता येईल, असे मोदी म्हणाले. 

08:17 August 15

उडान योजनेच्या माध्यमातून लोकांची स्वप्न पूर्ण होत आहेत. 

08:16 August 15

गावांतील जमिनी विवादाचे नाही, तर विकासाचे प्रमाण व्हाव्या - मोदी

08:15 August 15

 गावामंध्ये जमिनीची किंमत आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्यांना जमीन मिळत असूनही कर्ज मिळत नाही. मात्र, आज स्वामित्त्व योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला जमिनीच्या आधारावर कर्जासाठी मोजमापणी होत आहे. यामाध्यमातून गावातील जमिनीशी संबंधित वाद मिटत आहे. इतकेच नाही त्यांना कर्जही मिळत आहे, असे मोदींनी सांगितले. 

08:14 August 15

शेतकरी रेल्वेच्या माध्यमातून परिवहनाचा खर्च कमी होत आहे. आधुनिक सुविधेच्या माध्यमातून आपले उत्पादन पोहोचवू शकतो. अनेक देशांमध्ये भारतातील अनेक उत्पादने पोहोचवली जात आहे. भारतातील खाद्यान्न जगाची चव बनत आहे, असे मोदी म्हणाले. 

08:13 August 15

लहान शेतकरी देशाचे शान  - पंतप्रधान मोदी

08:12 August 15

आधीच्या सरकारांनी छोट्या शेतकऱ्यांना पुरेशा सेवा सुविधा दिल्या नाहीत. मात्र, आम्ही त्यांना सुविधा देऊ. 

08:12 August 15

कोरोनाकाळात वैज्ञानिकांची ताकद देशाने पाहिली. देशातील प्रत्येक क्षेत्रात आपले वैज्ञानिक छान कार्य करत आहेत. आता कृषी क्षेत्रातही त्यांच्या ज्ञानाला जोडण्याची गरज आहे. त्याचा फायदा करुन घ्यायचा आहे. भाज्या आणि फळ यांचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे.  

08:12 August 15

8 कोटींहून अधिक सेल्प हेल्प गृप आहे. त्याला मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना मदत होणार आहे.

08:11 August 15

या दशकात नवीन अर्थव्यवस्थेच्या निर्माणासाठी पूर्ण शक्ती लावायला हवी. गावांमध्ये विशेष सुविधा पाहायला मिळत आहे. मात्र, ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचत आहे. गावांमध्ये डिजीटल उद्योजक तयार होत आहेत.  

08:11 August 15

सहकार एक संस्कार आहे. एक सोबत चालण्याची प्रवृत्ती आहे. त्याचे सशक्तीकरण व्हावे यासाठी आम्ही एक विशेष मंत्रालय बनवले आहे.  

08:11 August 15

अर्थ जगतात पूंजीवाद आणि समाजवाद या विषयावर फार चर्चा होते. मात्र, भारत सहकारवाद वरही विशेष भर देतो. सहकारवादने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे.

08:11 August 15

देशात 110हून अधिक जिल्ह्यांमध्ये विशेष सेवा  

08:11 August 15

खनिज संपदा समुद्रात आहे, थर्मल ऊर्जा देशाला विकासाला गती देऊ शकते.  

08:11 August 15

एकीकडे लद्दाख आधुनिकीकरणाकडे प्रयाण करत आहे. तर केंद्रीय विद्यापीठ त्याचा गौरव वाढवत आहे.  

08:01 August 15

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे आपली ध्येय साध्य करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

07:20 August 15

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हस्ते ध्वजारोहण

07:20 August 15

पंतप्रधानानांचे लाल किल्ल्यावर आगमन

06:06 August 15

#IndiaAt75 : 15000 फुटांवर #Adikailash च्या पायथ्याशी फडकावला तिरंगा

पंतप्रधानांचे ट्विट

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, "आपल्या सर्वांना 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे या वर्षात देशवासियांमध्ये नवीन ऊर्जा आणि नवीन चेतनेचा संचार होवो. जय हिंद!" 

Last Updated : Aug 15, 2021, 12:57 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details