नवी दिल्ली : इथेनॉलचे मोठ्या स्तरावर उत्पादन घेतल्यास, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील ३३ नव्या महामार्ग प्रकल्पांचे शनिवारी गडकरींच्या हस्ते व्हर्चुअल उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कर्नाटक हे देशातील प्रमुख उस उत्पादक राज्यांमध्ये गणले जाते. त्यामुळे याठिकाणी इथेनॉलचे मोठे प्रकल्प उभारणे सहज शक्य आहे, असेही ते म्हणाले.
"देशात मोठ्या प्रमाणात साखर आणि तांदळाचे उत्पादन घेतले जाते. सरकारकडे या दोन्ही गोष्टींचा मुबलक साठा आहे. त्यामुळे, जादाचे उत्पादन हे इथेनॉल बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. इथेनॉलचा वापर वाहनांच्या इंधनात होतो. यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पादनच वाढणार नाही, तर आपल्या देशाला इंधनासाठी आत्मनिर्भर बनवण्याकडे हे महत्त्वाचे पाऊल असेल" असे गडकरी म्हणाले.
कर्नाटकात १० हजार कोटींचे प्रकल्प..