आंध्रप्रदेश - अवघ्या ५० रुपयांवरून सुरू झालेल्या भांडणात एका तरुणाला जीव गमवाला लागला आहे. ही घटना आंध्रप्रदेश राज्यात घडली. बाजी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोतेश्वरा राव नामक व्यक्ती आपल्या दोन मित्रांसोबत दुध घेण्यासाठी दुकानावर गेला असता दुकानातील कर्मचारी बाजीसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर तिघांनी बाजीला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
कोतेश्वराचा बाजीसोबत ५० रुपयांवरून वाद झाला. मात्र, शाब्दिक वादानंतर तिघांनी त्याला हाणामारी केली. यात बाजी बेशुद्ध पडला. त्याला सत्तनपल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत मृताच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीस दोन मुले आहेत.