भोपाळ रतलाम नर्मदापुरमराज्यात मुसळधार पावसामुळे नर्मदेच्या काठावर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली Flood Crisis Due To Heavy Rain आहे. राज्यातील संततधार पाऊस आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता, पूरस्थिती टाळता यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी धरणांमधून अधूनमधून पाणी सोडण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी नर्मदेच्या काठावर वसलेल्या गावातील लोकांनी आपल्या पशुधनासह उंच ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणताही धोका होऊ नये. Flood Crisis CM Shivraj Discussed With Collectors
मध्यप्रदेशात पूरस्थिती गंभीर नर्मदेच्या पाटावर बेटवा मुसळधार पावसामुळे कुरवई ते सिरोंज, विदिशा, भोपाळ गुना, राजगढ, बिओरा हा रस्ता बंद झाला, कुरवई बेटवा पुलावर पाणी आल्याने पुलावर तीन फुटांपर्यंत पाणी वाहत आहे. तसेच मांडला ते सिवनी, ओरछा ते पृथ्वीपूर, चंदेरी ते ललितपूर आणि बरेली ते पिपरिया हे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
रतलाममधील स्थितीरतलाम जिल्ह्यात रात्री उशिरापासून पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे नदी नाला तुंबला आहे. पावसामुळे पिपलोडा आणि सुखेडा या शहरांमध्ये सर्वाधिक समस्या निर्माण झाल्या असून, निनोर व रोजड नद्यांना पूर आला असून, त्यामुळे पिपलोदा येथील बसस्थानक पूर्णत: पाण्याखाली गेले आहे. पावसामुळे येथील रिकामी बस रात्री उशिरा रोजड नदीच्या पाण्यात बुडाली. यासोबतच पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, या दोन्ही नद्या गावातून जातात, त्यामुळे गावात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळेच पावसाचे पाणी दुकाने व घरात शिरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मध्यप्रदेशात पूरस्थिती गंभीर शाळांना सुट्टी जाहीरमध्य प्रदेशात संततधार पावसामुळे राज्यातील सर्व नद्या धोक्याच्या चिन्हावर आल्या आहेत किंवा पूर आला आहे. त्याचवेळी भोपाळ, जबलपूर, नर्मदापुरम आणि अशोकनगर या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून भोपाळ-सिहोरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.
नर्मदापुरम प्रशासन अलर्टवरगेल्या ४८ तासांहून अधिक काळ पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातही पाणी तुंबण्याची स्थिती आहे, तर तवा धरणासह बारगीचे पाणीही नर्मदापुरम जिल्ह्यात पोहोचत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही सतर्कतेवर असून सेठणी घाटाची पाणीपातळीही ९६५.८० फूट इतकी नोंदवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाणी साचलेल्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा : मुसळधार पावसामुळे बर्गी, बारणा, तवा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने आणि संततधार पावसामुळे नर्मदा नदीने धोक्याचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा अन्य शहरांशी संपर्क तुटला आहे, तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नर्मदापुरम विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोकांना पुरापासून वाचवण्यासाठी चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, "कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून सखल भागातील गावे आणि वस्त्या रिकामी करण्यात येत आहेत. सहकार्य करा. पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.
येथे मुसळधार पाऊस राज्याची राजधानी भोपाळसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे, गेल्या 24 तासात भोपाळमध्ये 132.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय रायसेनमध्ये 168 मिमी, पचमढीमध्ये 140 मिमी, नर्मदापुरममध्ये 89.9 मिमी, सागरमध्ये 81 मिमी, ग्वाल्हेरमध्ये 76 मिमी, मंडलामध्ये 71 मिमी, जबलपूरमध्ये 61 मिमी पाऊस झाला आहे.
मध्य प्रदेशात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी मध्य प्रदेश हवामान खात्याने राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि 7 विभागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, ग्वाल्हेर चंबळ विभागासह राजगढ, नीमच, रतलाम, ऑरेंज आणि यलो अलर्ट शाजापूर, आगर, मंदसौर, उज्जैन आणि रायसेनमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची सूचना देण्यात आली आहे. दुसरीकडे, इंदूर, भोपाळ, उज्जैन, नर्मदापुरम, चंबल आणि ग्वाल्हेर विभागात अनेक ठिकाणी आणि जबलपूर, शहडोल, रीवा आणि सागर विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ग्वाल्हेर आणि चंबळ विभागांसह उज्जैन, नीमच, मंदसौर, रतलाम, शाजापूर, आगर आणि राजगढमध्ये विजा आणि लखलखाटामुळे पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा -Monsoon Session शिवसेनेच्या ५५ आमदारांना उद्धव ठाकरे गटाकडून व्हिप जारी