नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात दिल्लीत मागील एक महिन्यापासून हरियाणा, पंजाब येथील शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रोज नवीन पद्धतीने हे शेतकरी आंदोलन करत आहेत. आज दिल्लीजवळील चिल्ला बॉर्डरजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसमोर पुंगी वाजवून आंदोलन केले. यात महिला आंदोलकांचाही समावेश होता.
सरकारने पुन्हा दिले चर्चेसाठी निमंत्रण -
गुरुवारी कृषी सचिव विवेक अग्रवाल यांनी शेतकरी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी संघटनांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले गेले आहे. मात्र, संयुक्त किसान मोर्चाने, सरकारने अर्थहीन चर्चेसाठी बोलवू नये, अशी भूमीका बुधवारी घेतली होती. गेल्या एक महिन्यापासून ४० विविध शेतकरी संघटना दिल्लीच्या सिंघु, टीकरी आणि गाझीपूर सीमेवर आंदोलन करत आहेत.