महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 27, 2021, 9:02 AM IST

ETV Bharat / bharat

शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद; जाणून घ्या 'त्या' तिन्ही कृषी कायद्यांविषयी

17 सप्टेंबर 2020 रोजी शेतीशी संबंधित तीनही कायदे संसदेत मंजूर झाले. हे तेच कायदे आहेत, ज्यांच्या विरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले शेतकरी आंदोलन अजूनही चालू आहे. त्या तीन कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला काँग्रेसकडून पाठिंब देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद
शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाचे वतीने आंदोलन सुरू आहे. हे आदोलन आथा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदचे आवाहन केले आहे. आज(सोमवारी) सकाळी 6 वाजल्या पासून 4 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनाला काँग्रेस आणि आपने पाठिंबा जाहीर केला आहे. 17 सप्टेंबर 2020 रोजी शेतीशी संबंधित तीनही कायदे संसदेत मंजूर झाले. हे तेच कायदे आहेत, ज्यांच्या विरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले शेतकरी आंदोलन अजूनही चालू आहे. ते तीन कायदे काय आहेत ज्यामुळे सरकार आणि शेतकरी यांच्यात एक प्रकारचा संघर्ष उभा राहिला आहे, ते जाणून घेऊया.

1. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) विधेयक 2020

यानुसार शेतकरी आपली पिके हव्या त्या ठिकाणी विकू शकतात. आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय इतर राज्यामध्ये पिकांचे घेतलेले उत्पादन विकू आणि खरेदी करू शकतो. याचा अर्थ एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) च्या कार्यक्षेत्राबाहेर पिके खरेदी आणि विक्री करता येतात. तसेच, पिकाच्या विक्रीवर कोणताही कर लागणार नाही. ऑनलाईन विक्रीलाही परवानगी असेल. यामुळे शेतकर्‍यांना चांगला भाव मिळेल.

शेतकऱ्यांचा आक्षेप -

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ते त्यांच्या इच्छेनुसार उत्पादन विकण्यास त्यांना मुभा नाही. तसेच बाजार समितीनुसार अन्य ठिकाणी माल साठवणुकीच्या सुविधा नाहीत. त्यामुळे ते चांगला भाव मिळे पर्यंत शेतमाल घेऊन वाट पाहू शकत नाहीत. खरेदीला लागणारा वेळ पाहता शेवटी शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीने मालाची विक्री करण्याचा पर्याय निवडावा लागतो. तसेच बाजारातील कमिशन एजंट हे शेतकऱ्यांना शेती आणि वैयक्तिक गरजांसाठी उसणे पैसे देतात. प्रत्येक एजंटशी सरासरी 50-100 शेतकरी जोडलेले असतातच. मात्र बऱ्याचदा हे एजंट अत्यंत कमी किमतीत पीक खरेदी करतात आणि त्याची साठवणूक करतात व पुढील हंगामात एमएसपीवर त्याची विक्री करून जास्त नफा कमवतात असे आंदोलक शेतकऱ्यांचे मत आहे.

2. किंमत हमी आणि कृषी सेवा कायदा 2020

देशभरात कंत्राटी शेतीची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. पीक अयशस्वी झाल्यास, त्याचे नुकसान शेतकऱ्यांनी नव्हे तर कंत्राटी पक्षांनी किंवा कंपन्यांनी भरून द्यावे लागेल. शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) हा कायदा शेती करारावर राष्ट्रीय आराखडा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करेल, जे शेतकर्‍यांना कृषी-व्यवसाय कंपन्या, प्रक्रिया उद्योग, घाऊक विक्रेते, निर्यातदार किंवा मोठ्या विक्रेत्यांसह शेती सेवा आणि भावी शेतीच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी परस्पर मान्य केलेल्या मोबदल्याच्या किंमतीत योग्य आणि पारदर्शक पद्धतीने आणि त्यायोगे संबंधित किंवा संबंधित गोष्टींसाठी गुंतवणूकीस सामर्थ्य प्रदान करेल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि मध्यस्थ राजवट संपेल. हे

शेतकऱ्यांचे आक्षेप आहेत -

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मोठ्या कंपन्या वादग्रस्त परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील आणि पिकाची किंमत ठरवतील. मोठ्या कंपन्या छोट्या शेतकऱ्यांशी तडजोड करणार नाहीत.

3 अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020-

या कायद्यान्वये तृणधान्ये, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदा आणि बटाटे या वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे खासगी गुंतवणूकदारांच्या त्यांच्या व्यवसायात अत्यधिक नियामक हस्तक्षेपाची भीती दूर होईल. उत्पादन, पकड, हलविणे, वितरण आणि पुरवठा करण्याचे स्वातंत्र्य यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था उपयोगात आणता येईल आणि खाजगी क्षेत्रातील / परकीय गुंतवणूकीला कृषी क्षेत्रात आकर्षित करता येईल.

शेतकऱ्यांचे आक्षेप-

असामान्य परिस्थितीसाठी किंमती इतक्या जास्त असतील की सामान्य माणसाला उत्पादनांची खरेदी करणे शक्य होणार नाही. कॉर्पोरेट जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या साठवणुकीवर सूट देऊन पिकांचा खर्च कमी करू शकतात. कंत्राटी शेतीचे सध्याचे स्वरूप अलिखित आहे. सध्या केवळ निर्यातक्षम बटाटे, ऊस, कापूस, चहा, कॉफी आणि फुलांच्या उत्पादनासाठी करार केले जातात. काही राज्यांनी सध्याच्या कृषी कायद्यानुसार करार शेतीसाठी नियम बनवले आहेत.

राकेश टिकैत प्रत्येक वेळी सांगत आहेत की ते सरकारसोबत बोलणी करण्यास तयार आहेत. मात्र सरकारने कोणत्याही अटींशिवाय बोलावे. पण प्रत्येक वेळी सरकारकडून हेच ​​उत्तर येते की शेतकर्‍यांनी कृषी कायदा मागे घेण्याच्या अटीवर बोलू नये. प्रत्येक वेळी सरकारकडून सुधारणा सांगितली गेली आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की 10 महिन्यांपासून आंदोलन सूरू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीर तोडगा कधी निघणार.

हेही वाचा - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद, गाझीयाबाद मार्ग बंद करणार

हेही वाचा - झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी 'भारतबंद' - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details