श्रीनगर -आजच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताचे 40 जवान हुतात्मा झाले होते. आता पुन्हा दोन वर्षानंतर आजच्या दिवशी पुन्हा हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनांचा डाव होता. मात्र, प्रसंगावधान दाखवत पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टाळली आहे. जम्मूच्या बस स्थानकातून 7 किलो विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या सतर्कतेमुळे मोठा अर्नथ टळला आहे.
जम्मूमध्ये दहशतवादी कारवाया होत असल्याने सुरक्षा दल आणखी सतर्क झाले आहे. लश्कर-ए-मुस्तफाचा दहशतवादी मलिकला अटक, सांबामध्ये सुरंग आणि हत्यारे आढळल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, दहशतवाद्यांनी दहशतवादी कारवाया वाढवल्या आहेत.