महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ED Action : काँग्रेस नेत्यांच्या घरी ईडीचा छापा! सूडाच्या राजकारणाला पक्ष घाबरणार नाही; काँग्रेसचे स्पष्टीकरण - ED in Chhattisgarh

काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी ईडीने छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा छापे टाकले आहेत. रायपूर दुर्ग भिलाईसह अनेक ठिकाणी ईडीचे पथक पहाटे अनेक बड्या काँग्रेस नेत्यांच्या घरी पोहोचले. ईडी रायपूर, दुर्ग भिलाईसह 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. यावर तिखट शब्दांत काँग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेत्यांच्या घरी ईडीचा छापा
ED Action

By

Published : Feb 20, 2023, 4:23 PM IST

रायपुर:कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून छत्तीसगडमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. छत्तीसगडमधील काँग्रेस नेते राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त असताना हे छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी सकाळी 5 वाजल्यापासून ईडी काँग्रेस नेत्यांच्या घरी पोहोचली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष राम गोपाल अग्रवाल, प्रवक्ते आरपी सिंह, कामगार कल्याण विभागाचे अध्यक्ष सनी अग्रवाल, महासचिव रवी घोष, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.

हिंडेनबर्ग वादावर पंतप्रधानांचे मौन : काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश म्हणाले, 'आज सकाळी जे काही पाहिलं ते थर्ड-रेट राजकारणाचं उदाहरण आहे. हा राजकीय सूड आहे. अशा कोणत्याही कारवाईला आम्ही घाबरत नाही. चिनी घुसखोरी आणि अदानी-हिंडेनबर्ग वाद यांसारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान मौन बाळगतात. परंतु, पूर्ण अधिवेशनाच्या काही दिवस आधी काँग्रेस नेत्यांना ईडीकडे पाठवतात असा घाणाघात यावेली जयराम रमेश यांनी केला आहे.

भारत जोडो यात्रेमुळे सरकार हादरले : पहाटे 5 वाजता छापा सुरू झाला आणि तो किती काळ सुरू राहील हे माहीत नाही. आमच्या पूर्ण अधिवेशनाच्या तीन दिवस आधी हे छापे पडले. आमचे बहुतेक नेते 23 फेब्रुवारीपासून रायपूरला पोहोचण्यास सुरुवात करतील आणि 24 फेब्रुवारीपासून नियोजनानुसार काम केले जाईल. भारत जोडो यात्रा यशस्वी झाल्याने केंद्र सरकार हादरले आहे. आणि त्यामुळेच म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचा दावा रमेश यांनी केला आहे.

आमची शालीनता आमची कमजोरी समजू नका : काँग्रेस अदानी-हिंडेनबर्ग मुद्द्यावर प्रश्न विचारत आहे. काँग्रेसचे मीडिया प्रमुख पवन खेडा यांनी ईडीला 'लोकशाही नष्ट करणारे' म्हणून संबोधले आहे. छत्तीसगडमधील कारवाईबाबत सरकारला इशारा दिला आहे. ईडीला एक नवीन नाव आणि मोदी सरकारमध्ये नवीन काम आहे ते म्हणजे लोकशाही नष्ट करणे असही ते म्हणाले आहेत. दरम्यान, आम्हीही काही राज्यांत सत्तेत आहोत. आमची शालीनता आमची कमजोरी समजू नका असही ते म्हणाले आहेत.

भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ झाले : प्रसार माध्यमे जेव्हा तुमच्यावर प्रश्न उपस्थित तेव्हा तुम्ही त्यांच्या कार्यालयावर छापे टाकतात. जेव्हा विरोधी पक्षाचे नेते संसदेत अदानीचा मुद्दा उपस्थित करतात तेव्हा तुम्ही त्यांच्या भाषणातील काही भाग हटवता. अदानी समूहावर कारवाई का झाली नाही? काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, ईडीने यापूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणात माजी पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि विद्यमान प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी केली होती. या संस्था फक्त विरोधी नेत्यांच्या विरोधात काम करत आहेत. परंतु, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अनेक राजकारणी भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ झाले असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा :चिन्ह धनुष्यबाण अन् शिवसेना नावाचा सौदा केला; 'सामना'तून प्रहार

ABOUT THE AUTHOR

...view details