महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 11, 2023, 9:53 AM IST

ETV Bharat / bharat

Delhi Liquor Scam : BRS नेत्या कविता ईडीची चौकशी टाळण्यासाठी नाटक करत आहेत - भाजप

दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीने भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना चौकशीसाठी बोलाविले, मात्र ती चौकशीसाठी न जाता दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे धरून बसली. आता भारतीय जनता पक्षाने यावर हल्लाबोल केला असून; भाजपमधील तेलंगणा राज्याचे प्रभारी तरुण चुघ यांनी याला नाटक म्हटले आहे.

Delhi Liquor Scam
भाजपचा के. कविता यांच्यावर आरोप

नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होण्याच्या एक दिवस आधी, बीआरएस नेत्या के. कविता यांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करावे, अशी मागणी करत जंतरमंतरवर उपोषण केले. यामध्ये बीआरएस नेत्या के. कविता यांनी काँग्रेस वगळता 16 पक्षांना निमंत्रण पाठवले होते, त्यापैकी 12 पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दुसरीकडे भाजपने हा तपासावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

तरुण चुघ यांची टीका :भारतीय जनता पक्षाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले की, 'भ्रष्टाचार करून गरिबांची संपत्ती लुटल्यानंतर आता एजन्सी त्याच्या विरोधात काम करत असताना के. कविता नाटक करतेय. दिल्लीतील दारू माफियांशी संबंध असल्याने बीआरएस नेत्याला ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले जात असताना, आता ती विरोधी पक्षांसोबत नाटक करत असल्याचे भाजप नेत्याने सांगितले'.

रेकॉर्ड तपासण्याचा चुघ यांचा सल्ला : केवळ दोनच अधिवेशने उरली आहेत, या प्रश्नावर भाजप नेत्या के. कविता यांची मागणी आहे की, या दोन अधिवेशनात सरकारला हवे असल्यास हे विधेयक मंजूर करून घेऊ शकते. भाजपचे तेलंगणा प्रभारी तरुण चुघ म्हणाले की, 2014 पूर्वी त्यांचे वडील केंद्रात मंत्री होते, त्यांनी महिला आरक्षणासाठी किती वेळा त्यांच्या सरकारसमोर आवाज उठवला ते पाहण्यासाठी फक्त रेकॉर्ड पहा.

तेलंगणामध्ये महिलांच्या छेडछाडीच्या सर्वाधिक घटना आरोप : टीआरएसची सत्ता असलेल्या तेलंगणामध्ये महिलांच्या छेडछाडीच्या सर्वाधिक घटना घडल्याचा आरोपही भाजप नेत्याने केला आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे सरकारी वाहनांतूनही मुलींवर बलात्कार झाले असून; सरकार अनेक दिवस गप्प बसले.

देशात प्रथमच गुन्हेगारांचा वंश न बघता कारवाई : भाजप नेते तरुण चुघ म्हणाले की, देशात प्रथमच गुन्हेगारांचा वंश न बघता कारवाई केली जात आहे, अन्यथा गेल्या सात दशकांपासून असेच घडत होते. तेलंगणाच्या निवडणुकीशी त्याचा काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. दिल्लीत कोणती निवडणूक आहे? पण 14 फोन फोडल्याचे पुरावे समोर आहेत, ज्यांना संरक्षक बनवले गेले ते भक्षक कसे झाले?, याचे उत्तर जनतेला हवे आहे.

हेही वाचा : Lotus aims for Kerala after NE : ईशान्येतील राज्यांनंतर भाजपची केरळकडे वाटचाल, वाचा संपूर्ण बातमी.

ABOUT THE AUTHOR

...view details