नवी दिल्ली -दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला फटकारले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून न्यायालयाने केजरीवाल सरकारवर आक्षेप नोंदवले आहेत. 'दिल्ली लवकरच कोरोना कॅपिटल बनेल' अशा शब्दांत न्यायालयाने केजरीवाल सरकारला खडसावले. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारला कोरोना स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
दिल्ली सरकार अनेक दावे करत आहे. कोरोना चाचण्या वाढवल्या असल्याचे दिल्ली सरकार म्हणते. मात्र, वास्तवात दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, असा आरोप न्यायालयाने केला आहे.