महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : गांधीजींनी म्हटलेलं 'हृदयाचे शहर', येथील सोकल कुटुंबाने जपलाय स्वातंत्र्याचा खजिना

राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Freedom Fighter Mahatma Gandhi ) यांनी सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांच्या आधारे ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन ( Fight Against the British ) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हरदामधील सोकल कुटुंब. ( Sokal family From Harda ) जे शहरातील अनेकांप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीच्या ( Freedom movement ) पहिल्या रांगेत होते.

By

Published : Dec 4, 2021, 6:04 AM IST

सोकल कुटुंबाची गाथा
सोकल कुटुंबाची गाथा

हरदा (मध्य प्रदेश) - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Freedom Fighter Mahatma Gandhi ) यांनी सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांच्या आधारे ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन ( Fight Against the British ) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हरदामधील सोकल कुटुंब. ( Sokal family From Harda ) जे शहरातील अनेकांप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीच्या ( Freedom movement ) पहिल्या रांगेत होते.

स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणी जपणाऱ्या परिवाराची गाथा

सोकल कुटुंबातील सदस्य, दिवंगत स्वातंत्र्यसैनिक चंपालाल शंकर आणि त्यांचे वडील तुळशीराम सोकल यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हरदा येथील स्वातंत्र्य चळवळीत अनेक कुटुंबे सहभागी झाली असली तरी गांधीजींच्या जवळीकतेमुळे सोकल कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात होते. सोकल कुटुंबामुळेच हरदा येथील रहिवाशांनी 8 डिसेंबर 1933 रोजी गांधीजींच्या भेटीत त्यांना मोठी देणगी दिली होती. दिवंगत स्वातंत्र्यसैनिकाचे कुटुंब आजही गांधींच्या 1933 मधील हरदा येथील आठवणी जपत आहे. चंपालाल यांच्या दोन मुली, ज्या गांधीजींनी त्यांच्या हरिजन कल्याणाच्या मोहिमेचा भाग म्हणून त्यांच्या गावाला भेट दिली तो दिवस आजही आठवतात.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : गांधी अभ्यासाचे आदर्श ठिकाण 'नवजीवन ट्रस्ट'!

  • 'या' घटनेमुळे प्रभावित झाले गांधीजी

सरला यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, हरदा येथील जवळपासच्या गावातील आणि शहरातील मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या दोन्ही भागात उभे राहिले आणि बापूंवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. गांधींना भेटण्यासाठी सर्वजण संयमाने रांगेत उभे राहिले. ज्यामुळे गांधीजी खूप प्रभावित झाले. लोकांना संबोधित करताना त्यांनी त्यांना सांगितले, की अशी शिस्त कुठेही पाहिली नाही आणि त्यांनी हरदाला "हृदयाचे शहर" म्हटले.

  • गांधींना चांदीचा ट्रे दिला भेट

हरदा येथील लोकांनी गांधींना पैशांनी भरलेली पिशवी दिली. त्यांनी 1,633 रुपये आणि 15 आणे जमा केले, जी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठी रक्कम होती. हरिजन सेवक नावाच्या वृत्तपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या दौऱ्यात जमा झालेली ही कदाचित सर्वात मोठी रक्कम असेल. गांधींच्या भेटीच्या अनमोल आठवणी सांगताना, सोकल भगिनी सांगतात, की गांधींना चांदीचा ट्रेही भेट देण्यात आला होता. ज्याचा त्याच वेळी लिलाव करण्यात आला. तुळशीराम सोकल यांनी लिलावातून हा ट्रे 101 रुपयांना विकत घेतला, जो सोकल भगिनींनी खजिना म्हणून जतन केला आहे. आपल्या वडिलांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी, मुलगी सरला सोकल यांनी गुजरातमधील साबरमती आश्रमाला चरखा आणि व्यतिरिक्त गांधीवादी साहित्याचा प्रसार करण्यासाठी एक हजार पुस्तके दान केली आहेत.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अज्ञातवासातील महत्त्वपूर्ण बंगला 'गिड्डापहार'

ABOUT THE AUTHOR

...view details