नवी दिल्ली - जगभरामध्ये नव्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा प्रसार होत आहे. यातच भारतामध्ये कोरोना रुग्णसंख्येत 20 हजार 35 ने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येचा आकडा 1 कोटी 2 लाख 86 हजार 709 वर पोहचला आहे. तसेच 256 मृत्यूची नोंद झाल्याने 1 लाख 48 हजार 994 बळी आतापर्यंत गेले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रिकव्हरी रेट वाढला असून तो 96.08 वर पोहचला आहे. तर मृत्यू दर हा 1.45 आहे.
98 लाख 83 हजार 46 रुग्ण कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 2 लाख 54 हजार 254 जणांवर देशातील विविध रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत. तर काल दिवसभरामध्ये आयसीएमआरने 10 लाख 62 हजार 420 कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. तर 17 कोटी 31 लाख 11 हजार 694 कोरोना चाचण्या आतापर्यंत पार पडल्या आहेत. भारतामध्ये कोरोनाचा प्रसार झाला होता. तेव्हा फक्त एक कोरोना लॅब होती. मात्र, आता देशभरात लॅबचे जाळे पसरले आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे.
भारतामध्ये नव्या कोरोना विषाणूचे २५ रुग्ण सापडले -