नवी दिल्ली: कोरोना साथीच्या आजाराच्या जवळपास दोन वर्षानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, भारत रविवारपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्यास तयार आहेत. आदेशात म्हटले आहे की परदेशी विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. ग्रीष्मकालीन वेळापत्रक 2022 रविवार 27 मार्च 2022 पासून 29 ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे.
COVID-19: दोन वर्षांनंतर आजपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होणार - आंतरराष्ट्रीय उड्डाणे
भारत रविवारपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे (India to resume regular international flights) पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. मॉरिशस, मलेशिया, थायलंड, तुर्की, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, इराक आणि इतरांसह 40 देशांच्या एकूण 60 परदेशी एअरलाइन्सना (international flights) उन्हाळी वेळापत्रक 2022 मध्ये भारतात मान्यता देण्यात आली आहे.
![COVID-19: दोन वर्षांनंतर आजपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होणार international flights](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14848129-165-14848129-1648347634058.jpg)
आंतरराष्ट्रीय उड्डाणे
मॉरिशस, मलेशिया, थायलंड, तुर्की, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, इराक आणि इतरांसह 40 देशांच्या एकूण 60 परदेशी एअरलाइन्सना भारतात मान्यता देण्यात आली आहे. तथापि, काही नवीन एअरलाइन्स आहेत ज्यात इंडिया सलाम एअर, एअर अरेबिया अबू धाबी, क्वांटास आणि अमेरिकन एअरलाइन्सचा समावेश आहे, ज्यांनी भारतासोबत विमानसेवा सुरू केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, कोविड महामारीमुळे भारताने मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली होती.