नई दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या ( former prime minister rajiv gandhi ) प्रकरणातील सहा दोषींच्या मुदतपूर्व ( Rajiv Gandhi assassination case ) सुटकेविरोधात काँग्रेस लवकरच सर्वोच्च न्यायालयात नव्याने पुनर्विलोकन अर्ज दाखल करणार आहे. पक्षाच्या सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. केंद्र सरकारने या प्रकरणी आधीच पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
Rajiv Gandhi Assassination : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेविरोधात काँग्रेस पुनर्विचार याचिका दाखल करणार - Release of Nalini Sriharan
माजी पंतप्रधान राजीव गांधी ( former prime minister rajiv gandhi ) यांच्या हत्येप्रकरणी ( Rajiv Gandhi assassination case ) सहा दोषींच्या मुदतपूर्व सुटकेविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात नव्याने पुनर्विलोकन अर्ज दाखल करणार आहे.
![Rajiv Gandhi Assassination : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेविरोधात काँग्रेस पुनर्विचार याचिका दाखल करणार Rajiv Gandhi Assassination](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16990107-thumbnail-3x2-rajivgandhi.jpg)
काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की,"राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणारा एक नवीन पुनर्विलोकन अर्ज लवकरच सर्वोच्च न्यायालयात दाखल केला जाईल." 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन ( Release of Nalini Sriharan ) यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले होते.
सहा आरोपींची सुटका -गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याच्या तामिळनाडू सरकारने केलेल्या शिफारशीच्या आधारे न्यायालयाने हा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर नलिनी व्यतिरिक्त आरपी रविचंद्रन, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस, जयकुमार तुरुंगातून बाहेर आले.