महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Punjab CM After Amritpal Arrest : अमृतपालच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, रात्रभर झोप लागली नाही....

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कट्टरपंथी अमृतपाल सिंगच्या अटकेनंतरच्या परिस्थिती बाबत चिंंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मला रात्रभर झोप लागली नाही. मी दर 15 मिनिटांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेत होतो. पंजाबच्या जनतेने आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे आम्ही काम करत राहू.

By

Published : Apr 23, 2023, 10:29 PM IST

CM Mann After Amrutpal Arrest
मुख्यमंत्री भगवंत मान

चंडीगड (पंजाब):'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगला अटक केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्रकार परिषद घेऊन निवेदन जारी केले आहे. भगवंत मान म्हणाले की, 'मी पंजाबच्या तीन कोटी जनतेचे आभार मानतो. त्यांनी 30-35 दिवस भाऊबंदकीचा दाखला दिला आहे. 'पंजाबच्या तरुणांच्या हातात पदवी आणि क्रीडा पदके असावीत, अशी माझी इच्छा आहे. पंजाबच्या तरुणांनी कोणत्याही प्रलोभनात यावे असे मला वाटत नाही.

आम्हाला रक्तपात नको होता:मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चंडीगड येथून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, 18 मार्च रोजी कारवाई केली गेली तेव्हा त्याच दिवशी अमृतपालला अटक होऊ शकली असती; परंतु नंतर काहीही होऊ शकते. पंजाबमध्ये अनेक महिन्यांपासून कायदा मोडून शांतता बिघडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 18 मार्चला काही लोक पकडले गेले. पण आम्हाला गोळ्या वा रक्तपात नको होता. काही लोकांनी गुरुसाहेबांची पालखी अजनाळ्यात आणली. त्या दिवशीही डीजीपींना सूचना देण्यात आल्या होत्या की, काहीही झाले तरी गुरूसाहेबांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये. काही पोलीस जखमी झाले असले हे खरे आहे; मात्र तरीही अमृतपाल सिंग याला आज अटक करण्यात आली आहे. भारताची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशा इशारा मान यांनी दिला आहे. 'देशाला स्वतंत्र करण्यात आणि ते स्वातंत्र्य राखण्यात देशातील तरुणांचा आणि जनतेचा मोठा सहभाग आहे. पंजाबने आघाडीच्या राज्याची भूमिका बजावली आहे.

खलिस्तान समर्थकांना पाकिस्तानकडून निधी: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान रविवारी म्हणाले की, खलिस्तान समर्थकांना पाकिस्तान आणि इतर देशांकडून निधी मिळतो आहे. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांनी राज्यात अलीकडे केलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

'खलिस्तानला मोजक्याच लोकांचे समर्थन':गुजरातमधील भावनगर शहरात एका सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भगवंत मान म्हणाले की, 'पंजाब पोलिस हा मुद्दा हाताळण्यास पूर्ण सक्षम आहेत. पंजाबमधील खलिस्तान समर्थक चळवळीला फक्त काही मोजकेच लोक समर्थन देत आहेत. 1,000 लोक जे खलिस्तान समर्थक घोषणा देताना दिसले आहेत ते संपूर्ण पंजाबचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तुम्ही पंजाबमध्ये या आणि स्वतःच बघा की असे नारे कोण देत आहेत'.

'खलिस्तानींचे मास्टर्स पाकिस्तानमध्ये आहेत' : 'या हिंसाचारामागे काही मोजकेच लोक आहेत आणि ते पाकिस्तान आणि इतर परदेशातून आलेल्या निधीतून त्यांची दुकाने चालवतात', असे मान म्हणाले. 'राजस्थानची पाकिस्तानशी बरीच मोठी सीमा लागून आहे. असे असूनही पाकिस्तानमधून पाठवलेले ड्रोन पंजाबमध्ये का उतरतात? ते राजस्थानमध्ये का जात नाहीत? कारण खलिस्तानींचे मास्टर्स पाकिस्तानमध्ये बसले आहेत आणि त्यांना पंजाबला त्रास द्यायचा आहे. पण आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही', असे भगवंत मान म्हणाले.

हेही वाचा:Sharad Pawar Reacts On Ajit Pawar : अजित पवारांच्या बंडाच्या वावड्यांवर शरद पवारांचे मोठे विधान

ABOUT THE AUTHOR

...view details