महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 27, 2022, 11:27 AM IST

Updated : May 27, 2022, 12:44 PM IST

ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही - संभाजी राजे

राज्यसभेची निवडणुक मी लढणार नाही. मात्र, ही माघार नसून हा माझा स्वाभीमान आहे असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर धूडकावून लावली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही असा थेट आरोप केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही - संभाजी राजे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही - संभाजी राजे

मुंबई - सर्वात अगोदर मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर जायचे आणि शिवाजी महाराजांचे स्मरण करून बोलायचे. जर मी खोट बोललो असेल तर म्हणतील ती शिक्षा भोगण्यास तयार. असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवून आपल्याशी शिवसेनेने गद्दारी केल्याचा घाणाघाती आरोप आज शुक्रवार (दि. 27 मे)रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केला आहे.

मी निवडणूकीला समोर जाणार नाही -मी राज्यसभेच्या निवडणुकीला समोर जाणार नाही, परंतु याचा अर्थ मी माघार घेतली असे नाही असे स्पष्टीकरण छत्रपती संभाजीराजे यांनी दिले आहे. मी माझे स्वराज्य उभा करण्यासाठी आता सज्ज झालो आहे. त्यामुळे माझी कोणतीही नाराजी नाही. मी सर्वांनी मला पाठिंबा द्यावा अशी मी फक्त विनंती केली होती.

छत्रपती संभाजी राजे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे शिवसेनेकडून राज्यसभेवर जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शिवसेनेने संजय पवार यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर संभाजीराजे काय निर्णय घेणार व मुख्यमंत्री- संभाजीराजे यांच्यातील भेटीत काय घडले याची चर्चा होती. याबाबत आज संभाजीराजे यांनी खुलासा केला आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडला असंही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दोन खासदार माझ्याकडे पाठवले होते. तेव्हा आमची मिटिंगही झाली होती. तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा आम्ही उद्याच उमेदवारी जाहीर करतो. मात्र, मी अपक्ष म्हणून लढणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही, हे मी त्यांना स्पष्ट केले. त्यानंतर दोन दिवसांनी मला मुख्यमंत्र्यांनी फोन करुन वर्षावर येण्याचे आमंत्रण दिले. आपण सविस्तर बैठक घेऊन चर्चा करु असे ते मला म्हणाले त्यामुळं मीसुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो असही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आम्ही तीन मुद्द्यांवर बोललो. ते म्हणाले आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचे नाही असं म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला दिला. मात्र, तेव्हाही मी त्यांना नम्रपणे नकार दिला. त्याउलट मी त्यांना दोन प्रस्ताव दिले. शिवसेनेची ही जागा असे ते म्हणतात. त्यामुळे मी त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा, असा प्रस्ताव मी त्यांना दिला. पण राजे ते शक्य होणार नाही, असे म्हणून त्यांनी त्यास नकार दिला.


मुख्यमंत्र्यांनी आणखी एक प्रस्ताव दिला. तो म्हणजे, महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनापुरस्कृत उमेदवार करायला आम्ही तयार आहोत. मात्र, तो प्रस्ताव मी मान्य केला नाही. त्यावर मी त्यांना दोन दिवसांचा कालावधी विचार करण्यासाठी दिला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या मंत्र्यांचा मला फोन आला. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला सांगितली आहे. तुम्हाला अपक्ष पुरस्कृत उमेदवारी द्यायचीये. त्यावर आमची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी आणि मी दिलेल्या सूचना मिळून ड्राफ्ट तयार झाला, असंही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला भेटाले. त्यात मंत्री होते, त्यांच्या जवळचे स्नेही होते, एक खासदार होते. त्यांच्या स्नेहींनी सागंतिलं की आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. पण मी नकार दिला. त्यानंतर त्यांनी सांगितलेला ड्राफ्ट मी वाचला. त्यात एक शब्द होता. तो शब्द बदलल्यानंतर ड्राफ्ट फायनल झाला, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर मी कोल्हापूरला रवाना झालो. पण कोल्हापुरला जात असताना नवीन बातम्या दिसल्या. तर कोल्हापुरला गेल्यावर समजलं संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मी खासदारांना फोन केला हा काय प्रकार आहे?. पण तेही काही बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना फोन केला त्यांनी उचलला नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला. याचे वाइट वाटतंय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -मुंबईत तब्बल २६९ अनधिकृत शाळा गेल्या १० वर्षांपासून सुरू

Last Updated : May 27, 2022, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details