महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 20, 2022, 11:46 AM IST

Updated : Feb 20, 2022, 12:50 PM IST

ETV Bharat / bharat

Tragic accident in Kota : चंबळ नदीत कार कोसळली, वरासह 9 जणांचा मृत्यू, सीएम गेहलोत यांनी व्यक्त केला शोक

कोटा शहरातील चंबळ नदीच्या रियासत पुलावरून कार नदीत कोसळली आहे ( Car Fell In Kota Chambal River ). ज्यामध्ये वरासह 9 जणांचा मृत्यू झाला होता. ती वरातीची गाडी होती. जे वाल्मिकी समाजाच्या लोकांसह चौथ का बरवाडा येथून मध्य प्रदेशातील उज्जैनला जात होते. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Kota
Kota

कोटा -शहरातील चंबळ नदीच्या छोट्या पुलावर मोठा अपघात झाला आहे. या अपघात आज सकाळी वरातीची कार चंबळ नदीत पडली ( Car Fell In Kota ChambalRiver ). ज्यामध्ये नवदेवाचा समावेश होता. यामध्ये नवदेवासह 9 जणांचा मृत्यू झाला आहे ( 9 Died In Kota Road Accident ). ही गाडी पडताना कोणी पाहिली नाही. तेथून जाणाऱ्या लोकांनी कार पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडून महापालिकेच्या बचाव पथकाला माहिती मिळाली आहे. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

चंबळ नदीत कार कोसळली

बचावकार्यात 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत ( 9 Including The Groom Died In Kota ). यामधील सर्वांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. कार नदीत कशी पडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी सर्व व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात हलवले आहेत. महापालिकेचे डायव्हर विष्णू शृंगी आणि चालक सुरेश मंडावत यांनी सांगितले की, वरात चौथ का बरवडा ते उज्जैनकडे निघाली होती. पहाटे ५ वाजता हॉटेलमध्ये चहा पिताना हे लोक आपल्या कुटुंबीयांशी बोलले होते. त्यानंतर अपघाताचे घटना समोर येत आहे.

हे लोक केशोराई पाटण मार्गे बुंदी रस्त्यावरून कोटा शहरात दाखल झाले होते. ते चंबळच्या रियासत कालीन बिना मुंडेरच्या छोट्या पुलावरुन जात होते. अशाक गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी पाण्यात कोसळली. नवरदेवाचे नाव अविनाश बाल्मिकी असल्याचे समोर येत आहे. अशा स्थितीत सकाळी एका व्यक्तीने कार पाण्यात पाहिल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचावकार्य सुरू झाले. पोलिसांनी वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे आता वरात माघारी परतली आहे.

सीएम अशोक गेहलोत यांनी ट्विट करताना म्हणाले, ''कोटा येथे लग्नाच्या वरातीची कार चंबळ नदीत पडल्याने वरासह 9 जणांचा मृत्यू होणे, ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. शोकाकुल परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत, देव त्यांना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो, मृतांच्या आत्म्याला शांती लाभो.''

Last Updated : Feb 20, 2022, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details