बिजनौर - जिल्ह्यातील केमिकल कारखान्यात स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना घडली. यात पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
मोहल्ला बक्शीवालामधील एका छोटेखानी कारखान्यात फटाक्यांचे उत्पादन होते. ही केमिकल कारखाना युसूफ नामक व्यक्तीचा आहे. कामादरम्यान अचानक स्फोट झाला आणि त्यामुळे आग लागली. आगीने भीषण रूप धारण केले. यात पाच कामगारांचा जळून मृत्यू झाला. तर दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. कारखान्याचा मालक युसूफला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.