महाराष्ट्र

maharashtra

कसला बर्ड फ्लू अन् कसलं काय; तामिळनाडूमध्ये बिर्याणीची डिमांड झाली 'हाय'!

By

Published : Apr 4, 2021, 10:34 AM IST

आधी तिकीट मिळवण्यासाठी, मग उमेदवारी अर्ज भरताना आणि मग प्रचारसभांच्या वेळी 'गर्दी' जमा करणं आवश्यक असतं. त्याशिवाय लोकांना आपल्या 'शक्ती'बाबत कसं समजणार? मात्र, आजकाल असे नेते जवळपास नामशेष झालेत, ज्यांच्या सभांना न बोलावता गर्दी गोळा होईल. मग हा 'लाखोंचा' किंवा गेलाबाजार 'हजारोंचा' जनसागर आणायचा कसा? तर उत्तर आहे, बिर्याणी!

Biryani wooes participants in Tamil Nadu election rallies
कसला बर्ड फ्लू अन् कसलं काय; निवडणुकीमुळं बिर्याणीची डिमांड झाली 'हाय'!

चेन्नई :देशात एकीकडे बर्ड-फ्लूच्या भीतीने लोक चिकनकडे पाठ फिरवताना दिसतायत. मात्र, तामिळनाडूमध्ये बिर्याणीची डिमांड वाढताना दिसत आहे. त्याला कारण म्हणजे, विधानसभा निवडणुका. प्रचारापासून मतदानापर्यंत लोकांना बोलावण्यासाठी एक प्लेट बिर्याणी आणि एक 'चपटी' (स्वस्त देशी दारू) पुरेशी असते हे आता सर्वांनाच माहित झालंय. त्यामुळे दोन दिवसांवर आलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये बिर्याणीचा खप वाढलेला दिसून येतोय.

गरीब के प्लेट में पुलाव आया है, लगता है देश में चुनाव आया है..

आधी तिकीट मिळवण्यासाठी, मग उमेदवारी अर्ज भरताना आणि मग प्रचारसभांच्या वेळी 'गर्दी' जमा करणं आवश्यक असतं. त्याशिवाय लोकांना आपल्या 'शक्ती'बाबत कसं समजणार? मात्र, आजकाल असे नेते जवळपास नामशेष झालेत, ज्यांच्या सभांना न बोलावता गर्दी गोळा होईल. मग हा 'लाखोंचा' किंवा गेलाबाजार 'हजारोंचा' जनसागर आणायचा कसा? तर उत्तर आहे, बिर्याणी!

जेव्हा कधी एखादा नेता प्रचारासाठी सभा वा रॅलीचे आयोजन करतो, तेव्हा त्याचे कार्यकर्ते लोकांना 'बिर्याणी आणि बिस्लरी' वाटण्यात व्यग्र असतात. या मेजवानीच्या आमिषानेच ही गर्दी गोळा करण्यात आलेली असते. अशात मग कित्येकदा बिर्याणी कमी पडली म्हणून लोक गदारोळही करतात.

हॉटेलांची जय्यत तयारी..

विधानसभा निवडणुका अगदी परवावर आल्या असल्यामुळे, तामिळनाडूमधील कित्येक बिर्याणी शॉप्सनी विशेष तयारी सुरू केली आहे. कित्येक व्यावसायिकांनी जादा माणसं कामाला लावली आहेत. तर, कित्येकांनी विशेष बिर्याणी एक्सपर्ट मागवले आहेत. एकूण काय, तर आधी कोरोना लॉकडाऊन आणि नंतर बर्ड फ्लूमुळे मोडलेल्या बिर्याणी व्यावसायिकांच्या कंबरड्यावर आता निवडणुकांमुळे झंडुबाम लावलं जातंय.

हेही वाचा :खुर्चीसाठी कायपण! पंचायत निवडणुकांसाठी ४५व्या वर्षी ब्रह्मचर्य तोडत केलं लग्न

हेही वाचा :स्त्री-पुरुष समानतेमध्ये भारताचे स्थान घसरले; बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूतानही पुढे

ABOUT THE AUTHOR

...view details