कोट्टायम :केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका ( Bird Flu ) वाढला आहे. जिल्ह्यातील अर्पुकारा आणि थलायझम पंचायतींमध्ये फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला. अधिकाऱ्यांना बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघात सुमारे 8,000 बदके, कोंबडी आणि इतर पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहे. फ्लूच्या प्रादुर्भावाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी पी.के.जयश्री ( Collectorate P K Jayshree ) यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ( Bird Flu Outbreak Reported In Two Villages In Kerala )
अंडी,मांस विक्रीवर बंदी :पीके जयश्री यांनी स्थानिक संस्था आणि पशुसंवर्धन विभागाला बाधित क्षेत्राच्या एक किमी परिसरातील पक्षी मारण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा पीआरडीच्या म्हणण्यानुसार हा परिसर फ्लूमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासोबतच कोंबडी, बदक, इतर पाळीव पक्षी, अंडी, मांस आणि खत यांच्या विक्रीवर 13 डिसेंबरपासून तीन दिवस बर्ड फ्लूग्रस्त भागाच्या 10 किमी परिसरीत बंदी घालण्यात आली आहे.