महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 18, 2022, 1:09 PM IST

Updated : Apr 18, 2022, 1:19 PM IST

ETV Bharat / bharat

Three lakh drivers in Bhubaneswar : 3 लाख ड्रायव्हरचा विविध मागण्यांकरिता भुवनेश्वरमध्ये हल्लाबोल

पोलीस आयुक्तालय ( Commissionerate Police of Odisha ) म्हणण्यानुसार, भव्य पदयात्रा काढण्यासाठी आंदोलकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. भुवनेश्वरमधील पदयात्रेत ( Bhuvaneshwar Drivers padyatra ) सुमारे तीन लाख चालक सहभागी झाल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. ओडिशा ड्रायव्हर फेडरेशनच्या ( Odisha Drivers Mahasangh  ) बॅनरखाली हजारो चालकांनी भुवनेश्वरमध्ये पायी मोर्चा काढला आहे.

वाहन चालकांचा मोर्चा
वाहन चालकांचा मोर्चा

भुवनेश्वर ( ओडिशा ) - भुवनेश्वरमध्ये विविध मागण्यासांठी 3 लाख वाहन चालकांनी हल्लाबोल केला आहे. ओडिशामधील राजधानीतील अनेक रस्त्यांवर आणि चौकाचौकात गणवेश परिधान केलेल्या वाहन चालकांची गर्दी झाली आहे. संपूर्ण भुवनेश्वर शहर वाहन चालकांनी भरलेले दिसू लागले आहे. ओडिशाच्या 30 जिल्ह्यांतील सुमारे 3 लाख चालक राजधानी भुवनेश्वरला पोहोचले आहेत.

भुवनेश्वरची लोकसंख्या 12 लाख आहे. तर आंदोलनासाठी आलेल्या वाहन चालकांची संख्या 3 लाख आहे. असे असले तर शहरात हिंसाचार झाल्याचे वृत्त नाही. मात्र, एवढ्या संख्येने शहरात आलेले वाहन चालक म्हणजे गुप्तचर यंत्रणेचे पूर्णपणे अपयश असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. गणवेशातील वाहन चालकांची एवढी मोठी गर्दी राजधानीत यापूर्वी कधीही दिसली नव्हती.

भुवनेश्वरची एकूण लोकसंख्या १२ लाख आहे. त्याचवेळी सुमारे तीन लाख वाहनचालक अचानक शहरात पोहोचले. शहराची काय अवस्था असेल याची कल्पना करा. ओडिशाच्या राजधानीत खाकी वर्दीतील सुमारे 3 लाख चालक आपल्या 11 मागण्या घेऊन शहरात पोहोचले आहेत. त्यांच्या मागण्यांमध्ये अपघात विम्याचाही समावेश आहे. अपघातात मृत्यू झाल्यास चालकाच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी वाहन चालकांची मागणी आहे. यासह विविध 11 मागण्या घेऊन ( government fulfil 11 charter of demands ) वाहन चालक राजधानीत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही वाहन चालकांनी विविध मागण्यांसाठी असेच निदर्शने करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या संकटात ओडिशातील रस्त्यांवर वाहन चालक दिसत होते. ओडिशा ड्रायव्हर फेडरेशनच्या ( Odisha Drivers Mahasangh ) बॅनरखाली हजारो चालकांनी भुवनेश्वरमध्ये पायी मोर्चा काढला आहे. किमान वेतन, पेन्शन, विमा संरक्षण अशा १० मागण्या घेऊन चालकांनी पायी मोर्चा काढला आहे.

पदयात्रेसाठी परवानगी नाही-पोलीस आयुक्तालय ( Commissionerate Police of Odisha ) म्हणण्यानुसार, भव्य पदयात्रा काढण्यासाठी आंदोलकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. भुवनेश्वरमधील पदयात्रेत ( Bhuvaneshwar Drivers padyatra ) सुमारे तीन लाख चालक सहभागी झाल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. रस्त्यावर कोणतीही अनुचित घटना घडल्यास सर्वसामान्यांपासून चालकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने विशेष कायदा आणावा, हलक्या वाहनांच्या चालकांना किमान 15,000 रुपये आणि अवजड वाहनांच्या चालकांना 20,000 रुपये मानधन द्यावे, अशी महासंघाच्या सदस्यांची मागणी आहे. त्यांना 55 वर्षांनंतर मासिक पेन्शन, 20 लाख रुपयांचे विमा कवच, परवडणाऱ्या घरांच्या योजनेंतर्गत 5 लाख रुपये, रस्त्याच्या कडेला स्वच्छतागृहे आणि पार्किंगची सुविधा, त्यांना सुरक्षा कर्मचार्‍यांसारखे योद्धा म्हणून घोषित करण्याची मागणी केली.

हेही वाचा-World Heritage Day 2022 : आज जागतिक वारसा दिन; वाचा काय आहे यावर्षीची थीम

हेही वाचा-Ashish Mishra Bail Canceled : लखीमपूर खेरी प्रकरणात आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द

हेही वाचा-Loud Speaker Controversy : लाऊड स्पीकरवरून ना अजान ना हनुमान चालिसा, 'येथे' वाजविले जाते महागाईविरोधातील गाणे

Last Updated : Apr 18, 2022, 1:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details