महाराष्ट्र

maharashtra

'आई-वडिलांच्या फोटोंची लाज वाटते का?'; रवीशंकर प्रसादांची तेजस्वी यादवांवर बोचरी टीका

By

Published : Oct 27, 2020, 7:37 AM IST

१५ वर्षे लालू आणि राबडी यांनी बिहारचा कारभार पाहिला. मात्र, त्यांचेच फोटो तुम्ही आपल्या प्रचारादरम्यान वापरत नाहीये. कारण, तुम्हालाही माहित आहे, की त्यांना पाहताच लोक पूर्णीयामधील भट्टा बजारमध्ये झालेल्या अपहरणांबाबत विचारणा सुरू करतील अशी टीकाही यावेळी रवीशंकर यांनी केली..

Why are you so ashamed of your parents' photo: Ravi Shankar Prasad to Tejashwi
'आई-वडिलांच्या फोटोंची लाज वाटते का?'; रवीशंकर प्रसादांची तेजस्वी यादवांवर बोचरी टीका

पाटणा :केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राजद नेते तेजस्वी यांच्यावर सोमवारी निशाणा साधला. 'नव बिहार'चे आश्वासन देत तेजस्वी यादव प्रचार करत आहेत. मात्र, त्यांच्या पोस्टर्स आणि बॅनर्सवर लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे फोटोच नाहीत. दोघेही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, तरीही त्यांचे फोटो आपल्या पोस्टर्सवर लावण्याची तुम्हाला लाज का वाटते? असा प्रश्न रवीशंकर यांनी तेजस्वींना विचारला.

'आई-वडिलांच्या फोटोंची लाज वाटते का?'; रवीशंकर प्रसादांची तेजस्वी यादवांवर बोचरी टीका

पूर्णीयामध्ये पार पडली प्रचारसभा..

रवीशंकर प्रसाद पूर्णीयामधील आपल्या प्रचारसभेत बोलत होते. १५ वर्षे लालू आणि राबडी यांनी बिहारचा कारभार पाहिला. मात्र, त्यांचेच फोटो तुम्ही आपल्या प्रचारादरम्यान वापरत नाहीये. कारण, तुम्हालाही माहित आहे, की त्यांना पाहताच लोक पूर्णीयामधील भट्टा बजारमध्ये झालेल्या अपहरणांबाबत विचारणा सुरू करतील. त्यांना पाहताच लोकांना हे आठवेल, की कशा प्रकारे ते ही जागा सोडून चालले होते. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवींच्या कार्यकाळात पूर्णीयाच नव्हे, तर संपूर्ण बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते, अशी टीकाही यावेळी रवीशंकर यांनी केली.

..तर पुन्हा अपहरणे सुरू होतील

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाही यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की पूर्णीयामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या रीतीने लागू करणे हे इथल्या लोकांच्याच हातात आहे. तुम्ही एनडीएचा उमेदवार निवडाल, तर नक्कीच येथील अपहरणांच्या घटनांवर वचक बसेल. जर तुम्ही कोणता दुसरा उमेदवार निवडाल, तर मात्र अपहरणे पुन्हा सुरू होतील असे नड्डा यावेळी म्हणाले.

२००० पासून भाजपचे वर्चस्व..

बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. २८ ऑक्टोबर, तीन नोव्हेंबर आणि सात नोव्हेंबरला मतदान होईल. पूर्णीयामधील मतदान हे तिसऱ्या टप्प्यात, म्हणजेच सात तारखेला होणार आहे. २००० सालापासून पूर्णीया मतदारसंघामध्ये भाजपचे वर्चस्व राहिले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

हेही वाचा :राज्यसभा निवडणूक : उत्तर प्रदेशातून भाजपाची 8 जागांवर दावेदारी, तर उत्तराखंडमध्ये 1 उमेदवार

ABOUT THE AUTHOR

...view details