महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वंदे भारत : सौदी अरेबिया अन् कतारमध्ये अडकलेले 263 भारतीय मायदेशी परतले

कतरामधील डोहा येथून येथून 184 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे IX 244 विमान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सांयकाळी 7.20 ला दाखल झाले. तसेच रात्री 10. 48 ला सौदी अरेबियामधून 79 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे AI 1910 विमान देखील हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

By

Published : May 21, 2020, 10:28 AM IST

Vande Bharat
Vande Bharat

हैदराबाद - कोरोनामुळे अनेक भारतीय नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटक बाहेरच्या देशांमध्ये अडकले आहेत. त्यांना परत देशात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत' मोहीम सुरू केली आहे. वंदे भारत मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात कतार आणि सौदी अरेबियामधून 263 भारतीय बुधवारी मायदेशी परतले आहेत.

कतरामधील डोहा येथून येथून 184 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे IX 244 विमान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सांयकाळी 7.20 ला दाखल झाले. तसेच रात्री 10. 48 ला सौदी अरेबियामधून 79 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे AI 1910 विमान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

सर्व प्रवाशांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रवाशांना क्वारंटाईन कालावधीत कोरोनाची कोणती लक्षणे आढळून येतात का? यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर गरज पडल्यास उपचार केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे भारतात रुग्ण आढळून आल्याने 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिक भारताबाहेर अडकले होते. अशा नागरिकाना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत विमानाच्या माध्यमातून भारताबाहेरील नागरिकांना भारतात आणले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details