चिंता नको, आर्टिकल ३७१ ला हात लावणार नाही - अमित शाह - आर्टिकल ३७१
भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल ३७१ द्वारे नागालॅण्ड राज्यासाठी विशेष तरतूद केली आहे. भाजप या विशेष तरतुदीचा आदर करतो, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आर्टिकल ३७१ ला अथवा विशेष तरतुदींमध्ये छेडछाड केली जाणार नाही, असे अमित शाह यांनी सांगितले.

गुवाहाटी- जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवल्यानंतर भाजप सरकारकडून इतर विशेष दर्जा देण्यात आलेल्या राज्यांवरही कारवाई होईल, अशी टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुवाहटीमध्ये पूर्वोत्तर राज्यांच्या ६८ व्या परिषदेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी त्याविषयी वक्तव्य केले आहे.
भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल ३७१ द्वारे नागालॅण्ड राज्यासाठी विशेष तरतूद केली आहे. भाजप या विशेष तरतुदीचा आदर करतो, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३७१ कलमाला हात लावणार नाही. अथवा विशेष तरतुदींमध्ये छेडछाड केली जाणार नाही, असे अमित शाह यांनी सांगितले.