- मुंबई- परतीच्या पावसाने राज्यातील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती आणि शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यासाठीची तातडीने मदत मिळायला हवी. परंतु, या मदतीवरूनच राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे राहिले आहेत. राज्याला येणारा जीएसटीचा परतावाही मिळत नसल्याचे सांगत महाविकास आघाडीकडून कोणतीही भरीव मदत जाहीर न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी मात्र वाऱ्यावरच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने
- मुंबई - दिवसभरात राज्यात ८ हजार १५१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ७४ हजार २६५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज २१३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात राज्यात ८ हजार १५१ नवीन कोरोना रुग्ण; २१३ रुग्णांचा मृत्यू
- चंदीगड - केंद्र सरकारने मागील महिन्यात तीन कृषी कायदे आणले आहेत. या कायद्यांना पंजाब आणि हरयाणा राज्यातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. राज्यभर आंदोलने आणि निदर्शने सुरू असतानाच पंजाब सरकारने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी चार नवी विधेयके आणली आहेत. त्यानुसार तांदुळ आणि गहू जर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी/विक्री केला तर कमीत कमी ३ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद विधेयकात केली आहे.
..तर ३ वर्ष तुरुंगवास, केंद्रीय कायद्याविरोधात पंजाब सरकारची चार विधेयके
- नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज(मंगळवार) देशवासीयांच्या नावे संदेश जारी केला. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले. दसरा दिवाळी सण असल्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मोदींनी कोणतीही मोठी घोषणा केली नाही, किंवा भारत चीन वादावर वक्तव्य केले नाही. लॉकडाऊन गेले असले तरी कोरोना गेला नाही, असे म्हणत 'जब तक दवाई नही तब तक कोई ढिलाई नही', असे मोदी म्हणाले.
लस येत नाही तोपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई सुरुच राहणार - पंतप्रधान मोदी
- मुंबई- पावसामुळे राज्यातील नवीन कांद्याचे नुकसान झाले असून, जुन्या कांद्याचा साठा कमी प्रमाणात आहे. त्यातच परराज्यांतून मागणी वाढल्याने कांद्याचे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात नवीन कांद्याला प्रति किलो 30 ते 55 रुपये, तर जुन्या कांद्याला 50 ते 80 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात दर्जानुसार 80 ते 100 रुपये किलो या भावाने कांद्याची विक्री होत आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कांद्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी, 9 हजार क्विंटल उच्चांकी भाव