मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचित केली. यात त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. टाळेबंदीमुळे लग्न सोहळे रखडले आहेत. पण, यावर इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. एका क्रिकेटपटूने कोरोनावर मात केली आहे. या घटनांसह टॉप-१० घडामोडी वाचा सविस्तर...
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बातचीत केली आहे. कर्जत जामखेडमध्ये कोरोना कसा आटोक्यात आणला? तसेच राज्यातील तरुणाईसंदर्भात रोहित यांचे विचार काय आहेत? याबाबत रोहित यांनी ईटीव्ही भारतशी मनमोकळेपणाने संवाद साधलाय. पाहा रोहित पवार यांची ही विशेष मुलाखत...
पाहा काय म्हणाले रोहित पवार.. 'राज्यातील युवकांना हवं फक्त हक्काचं व्यासपीठ' आमदार रोहीत पवारांची ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत
- मुंबई - टाळेबंदीमुळे लग्न सोहळे रखडले आहेत. याचा फटका कॅटरिंग उद्योग, विवाह हॉल व्यवस्थापन यांना बसू लागला आहे. यावर उपाय म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली आहे.
वाचा काय आहे शक्कल -लग्न सोहळे पार पाडण्यासाठी नामी शक्कल, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने शोधला मार्ग
- वर्धा- आईने 200 रुपये न दिल्याने रागाच्या भरात गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पंजाब कॉलनी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. सर्वेश इंगळे असे 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. रामनगर पोलिसात घटनेची नोंद असून तपास सुरू आहे.
सविस्तर वाचा -धक्कादायक; आईने 200 रुपये न दिल्याच्या रागातून मुलाने घेतला गळफास
- मुंबई- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा १५ जुलैच्यादरम्यान घेण्याची तयारी असून त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिला असल्याची माहिती राज्यपालांना दिली. परंतु, आज या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे, या परीक्षा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाचा सविस्तर - वैद्यकीय परीक्षा आणखी लांबणीवर..! एमसीआयने दिल्या नवीन मार्गदर्शक सूचना
- जळगाव- कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून राज्य सरकारने शाळा सुरू करण्याऐवजी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातूनही या निर्णयाला तीव्र विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अज्ञानी पालक, स्मार्टफोन, इंटरनेट तसेच वीज अशा संसाधनांचा अभाव असल्यामुळे सरकारचा हा निर्णय फसण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.