- हैदराबाद -अलिकडच्या काही वर्षात भारत सरकार भारतीय वंशाच्या लोकांनी परदेशात यश मिळवले तर खूप गाजावाजा करते. मग ते कितीही दूर असू देत. म्हणूनच अमेरिकेतल्या राजकारणात उच्च स्थानावर पोचलेल्या, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर सरकार काहीच प्रतिक्रिया देत नाही, याचे आश्चर्य वाटते.
सविस्तर वाचा -'कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे नवी दिल्ली सरकारला काही सोयरसुतक नाही'
- नवी दिल्ली - आज कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन अतिशय साध्या पद्धतीने पार पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्ट रोजी सातव्यांदा लाल किल्यावरून देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व प्रथम सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सविस्तर वाचा -स्वातंत्र्य दिन : कोरोना संकट, कृषी क्षेत्र, नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनवर मोदींचे भाष्य
- नवी दिल्ली - आज देशभरात ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी देशवासियांना संबोधित करताना त्यांनी कोरोना योद्धांना नमन केले. कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी सेवा परमो धर्म मानून २४ तास काम करत आहेत. तसेच आजचा दिवस हा आपल्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा आणि महापुरुषांचा असल्याचा ते म्हणाले.
सविस्तर वाचा -देशात परकीय गुंतवणुकीत वाढ; पंतप्रधानांनी 'मेक फॉर वर्ल्ड'ची केली घोषणा
- कोल्हापूर -जमिनीच्या वादातून चार कुटुंबातील सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन या चार कुटुंबांनी आपल्या लहान मुलांसह पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे, पालकमंत्री सतेज पाटीलही कार्यालयात उपस्थित होते.
सविस्तर वाचा -जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार कुटुंबांचा लहान मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई - देश 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कोरोनाचा संसर्ग मात्र वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के आहे.
सविस्तर वाचा -महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; 12 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद, 364 जणांचा मृत्यू
- अहमदनगर - 'भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे भविष्य वर्तवले असले तरी त्यांनी सत्तेचे दिवास्वप्न पाहणे सोडून द्यावे, महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे चालणार आहे,' असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर येथे व्यक्त केला.