महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममधील पुरामुळे दरांग आणि सोनितपूर जिल्ह्यात गंभीर स्थिती; सखल भूप्रदेश जलमय - assam flood latest news

ब्रम्हपुत्रा आणि तांगणी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने दरांग आणि सोनितपूर जिल्ह्यातील मोठा भाग जलमय झाला आहे. पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सखल भागातील नागरिकांना घर सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे.

आसाम पूर
आसाम पूर

By

Published : Jul 23, 2020, 8:31 PM IST

गुवाहटी -आसाम राज्यातील बम्हपुत्रा नदीसह अनेक लहान-मोठ्या नद्यांना पूर आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. 30 जिल्ह्यांमधील नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. या आपत्तीत अत्तापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील दरांग आणि सोनितपूर जिल्ह्यातील परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे.

ब्रम्हपुत्रा आणि तांगणी नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने दरांग जिल्ह्यातील पूर्वेकडील ग्रामीण भाग जलमय झाला आहे. पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सखल भागातील नागरिकांना घर सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. साकोतला नदीच्या पाण्यामुळे मंगालदे आणि शिपाझार मतदारसंघात सगळीकडे पाणी साठले आहे. 'पुराचे पाणी माझ्या शेतात आले आहे. शेतातील सर्व पीक पाण्याने उद्धवस्थ झाले असून आमच्याकडे अत्यावश्यक वस्तू नाहीत. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पुरात सापडलेल्या एका स्थानिक नागरिकाने केली.

सोनितपूर जिल्ह्यातील परिस्थितीही गंभीर आहे. जिल्ह्यातील बोरसोला भागात पुराने थैमान घातेल आहे. आत्तापर्यंत राज्यात पुरामुळे 89 नागरिकांचा मृत्यू झाला असून 30 जिल्ह्यातील 55 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसला आहे, असे आसाम आपत्ती निवारण व्यवस्थापन विभागाने सांगितले.

केंद्र सरकारची राज्याला मदत

आसाममधील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच 346 कोटी रुपये मदत जाहीर करणार आहे. केंद्रीय जल आणि उर्जा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील पूर परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान शेखावत यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारच्या मदतीची माहिती दिली.

केंद्र सरकार लवकरच पूर व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत 346 कोटी रुपयांची मदत जाहीर करेल. आसाममधील जिल्ह्यातील पूर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार भूतान सरकारसोबतदेखील चर्चा करेल. कारण, पावसाळ्यात, भूतानमधील धरणातून जास्त पाणी सोडल्यामुळे आसामच्या सखल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषत: बरपेटा, नालबारी आणि कोकराझार या भागांमध्ये पूर येतो, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या (एएसडीएमए) माहितीनुसार, यावर्षी पूर आणि भूस्खलनात 115 लोकांचा बळी गेला आहे. त्यापैकी 89 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. तर 26 जण भूस्खलनामुळे मरण पावले आहेत. आसाममधील पूर परिस्थिती गंभीर बनली असून राज्यात सुमारे 56 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details