प्रश्नः काँग्रेसच्या प्रचारादरम्यान तुमच्या मातोश्री आणि तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भुषविलेल्या शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांवर सातत्याने बोलले जात आहे. मात्र, या महत्त्वपुर्ण निवडणुकांमध्ये तुमचा सक्रिय सहभाग दिसून आला नाही, ही बाब आश्चर्यदायी आहे. तुमची प्रतिक्रिया!
दिल्लीतील बहुतांश काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय काँग्रेस समितीच्या दिल्लीची जबाबदारी सांभाळणाऱ्या नेतृत्वाबरोबर माझे मतभेद आहेत. आत्ता यावेळी याविषयी बोलण्यात काहीही अर्थ नाही. मात्र, नेतृत्वाविषयी समस्या आहेत. त्यामुळे, मी गेल्या पाच-सहा वर्षांपासून असक्रिय आहे. जेव्हा शीलाजींची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष म्हणून झाली, मी त्यांना काही काळ मदत करत होतो. तेव्हापासून मी पडद्यामागे राहून काँग्रेससाठी राजकीय काम करत आहे.
प्रश्नः काँग्रेसला 2015 मधील निवडणुकांमध्ये एकाही जागेवर यश मिळाले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, यंदाही पक्षाने लढाऊ पवित्रा घेतलेला दिसत नाही. यावेळी पक्षाचे काय भवितव्य आहे, असे तुम्हाला वाटते?
एकही आमदार हाती नसणे आणि महानगरपालिका निवडणुकीतही चांगली कामगिरी न होणे ही पक्षासाठी साहजिकच पीछेहाट होती. आम्ही कठीण परिस्थितीचा सामना करीत होतो. मात्र, 2019 मधील लोकसभा निवडणुकीत आम्ही 5 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होतो, ही बाब आश्वासक आहे, आणि उमेदवार लवकर जाहीर झाले असते तर इतर आणखी दोन जागांवर आम्ही चांगली कामगिरी करु शकलो असतो. शीलाजींचे जाणे हे मोठे नुकसान होते. आमच्या पुढ्यात दोन मोठी आव्हाने आहेत. आमच्याकडे आप आणि भाजपकडे आहेत तशा प्रकारची संसाधने नाहीत. माध्यमांनी तत्त्वांशी तडजोड केलेली आहे. आपचे सरकार हे अतिशय सामान्य दर्जाचे सरकार आहे आणि मी त्यांची प्रचार मोहीम ऐकली आहे. हा प्रचार चुकीचा आहे. लोक पहिल्यांदाच विकासकामांसाठी मतदान करीत आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया असे म्हणत आहेत की, त्यांनी सरकारी शाळांचा कायापालट केला आहे. मात्र, शीलाजींच्या काळातदेखील या शाळा चांगली कामगिरी करत होत्या. दिल्ली परिवहन मंडळाच्या बसेसची संख्या कमी झाली आहे आणि हरित आच्छादनदेखील कमी होत आहे. प्रदुषण 25 टक्क्यांनी कमी झाले आहे, हा केजरीवाल यांचा दावा साफ चुकीचा आहे.
प्रश्नः परंतु काँग्रेसचा प्रचार एवढा तेजोहीन असण्याचे कारण काय?
पोस्टर्स आणि माध्यमांमध्ये आमची उपस्थिती नाही. शीलाजींच्या सरकारकडे पानभर जाहिरातींसाठी कधीही निधी उपलब्ध नव्हता. मात्र, केजरीवाल एक दिवसाआड वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती देत आहेत आणि याचा परिणाम माध्यमांवर होतो. त्यांनी सरकारी निधीचा गैरवापर केला आहे. काँग्रेसच्या सुवर्णकाळाचे आश्वासन पुर्ण करत आणि केजरीवाल यांनी सुरु केलेले अनुदान कायम ठेवत मात्र त्यामध्ये आणखी सुधारणा करीत या प्रचाराचा विरोध करु शकतो. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही बाब मतदारांच्या लक्षात येईल, असा मला विश्वास आहे. मात्र, ज्या लोकांनी काँग्रेसचा काळ पाहिलेला नाही आणि केवळ आपचा प्रचार ऐकला आहे तर हे आव्हानास्पद आहे. आता 18 ते 35 वयोगटात असलेले लोक शीला सरकारने 1998 सालापासून दिल्लीत जे विलक्षण बदल घडवून आणले त्याबाबत जागरुक नव्हते.
प्रश्नः काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे केलेला नाही. का?