महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2019, 1:31 PM IST

ETV Bharat / bharat

निसर्गाची परतफेड कशी करणार?

असे म्हटले जाते की, पूर्ण वाढलेला वृक्ष आपल्याला २४ लाख रुपयांचा प्राणवायू पुरवतो आणि ०.५३ टन कार्बन डायऑक्साईड आणि १.९५ किलो इतर प्रदूषणकारी घटक शोषून घेतो.तो आपल्याला पृथ्वीच्या गाभ्यात असलेले १,४०० गँलन पावसाचे पाणी साठवण्यासही मदत करतो. एखाद्या आरोग्यसंपन्न व्यक्तीला दिवसभराचा लागणारा प्राणवायू तीन सिलिंडर आहे. या दराने, एखाद्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी प्राणवायूची गरज असेल तर, त्याने आपल्या आयुष्यात तीन वृक्ष लावून वाढवले पाहिजेत. मानव मैत्रीपूर्ण आणि सामाजिक म्हणून ओळखला जातो. तरीसुद्धा मोठा प्रश्न हा आहे की, आमच्या अस्तित्वाचे स्त्रोत असलेल्या वृक्षांप्रति आम्ही किती मैत्रीपूर्ण आणि काळजी घेणारे आहोत?

The Challenge of Giving Back to Mother Nature an article by M karunagar reddy

वनस्पतींच्या संरक्षणासाठी लक्ष वेधताना, झाडे सर्वोत्कृष्ट शिक्षक असून ती आम्हाला निस्वार्थीपणा आणि त्याग शिकवतात - जांधल्या पपय्याशास्त्री

सेवाभिमुख निस्वार्थी सहाय्य करण्याचे जीवंत उदाहरण जे कुणाला पाहायचे असेल तर, झाडाशिवाय दुसरे नाही. या ग्रहावर असलेला प्रत्येक सजीव, झाडे आपल्याला पुरवत असलेल्या प्राणवायूवरच जगत असतो आणि याबरोबरच फळे, पाने, औषधे, लाकूड आणि आमची इतर उपजीविकांवर मानवही जगत असतात. त्यामुळे पृथ्वीवर झाड नसेल तर जीवनाचे अस्तित्वच धोक्यात असेल, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. जीवनाच्या कोणत्याही स्वरुपाची आणि निसर्गाची युगानुयुगे चालत आलेले विधी आणि भावनांच्या माध्यमातून प्रार्थना करण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये भारत प्रथम आहे. तरीसुद्धा, जे देश झाडे तोडण्याच्या सर्वोच्च दराला सामोरे जात आहेत, त्या देशांच्या यादीत भारत सर्वोच्च स्थानी आहे, हे नमूद करणेही धोक्याचा इशारा आहे. आणखी पुढे, दरडोई वनस्पतींच्या सर्वात खालच्या दरामध्ये भारताचे नाव आहे. अशा टप्प्यात, ग्रीन इंडिया चँलेंज अशासारख्या संस्था असणे हा इश्वराचा कृपाप्रसादच आहे, जी संस्था काळाची गरज असल्याबाबत जागृती करत असून, त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थी, राजकारणी, नोकरशहा, नामवंत लोक आणि सामान्य माणूस या समाजातील सर्व भागधारकांशी भागीदारी करून जागृती करत आहे.

जंगले धोक्यात..

भारतीय उपखंडात वैविध्यपूर्ण वातावरण असून ज्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशभर विविध वनस्पती आणि प्राणीसंपदा यांची भेट देणारी जैवविविधता आहे. तरीसुद्धा, देशात नागरिकांच्या संख्येशी झाडांच्या संख्येची तुलना आपण करतो. तेव्हा घसरती संख्या पाहून दुःख होते. जगात सरासरी दरडोई झाडांची संख्या ४२२ असली तर भारतात मात्र ही संख्या प्रतिव्यक्ती २८ आहे. सर्वात निराश करणारी गोष्ट ही आहे की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत, केवळ प्रति व्यक्ती चार झाडे ही स्थिती आहे.

संपूर्णपणे हरित आणि स्वच्छ शहरांच्या यादीत कॅनडा सर्वोच्च स्थानी असून, प्रति व्यक्ती, दरडोई वृक्षारोपण ८,९५३ आहे. यापाठोपाठ नंतर ४,४६१ वृक्षारोपणसह रशिया आणि ३,२६६ सह ऑस्ट्रेलिया आहे. दरडोई वृक्षारोपण यादीत इतका फरक का आहे, याची अनेक कारणे असून, सरकारने आणलेल्या धोरणांचे परिणाम, प्राचीन काळापासून असलेली हिरवळ, जनतेतील जागृती आणि जनतेचा सक्रीय सहभाग ही त्यापैकी काही कारणे असू शकतात. ही सर्व किंवा यापैकी बहुतेक कारणे भारतात दिसत नाहीत, जो दैनंदिन काळजीचा मुद्दा आहे, की झाडे तोडली जातात आणि नवीन झाड लावण्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारे आपण देशात झाडांचे पतन आणि जंगलतोडीचा उच्च दर पाहत आहोत. जंगलतोड आणि वृक्षांचे पतन हा केवळ भारतासाठी चिंतेचा मुद्दा नाही तर सर्व जगभर उच्च दराने सुरू आहे.

अमेरिकन संशोधन संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, पृथ्वी एक हजार कोटी हेक्टर क्षेत्रावरील हिरव्या वृक्षांनी भरलेली असायला हवी. तरीसुद्धा, १९९० सालापासून, सुमारे १२.९ कोटी हेक्टर क्षेत्रातील वृक्षारोपण नष्ट झाले असून, वृक्षांची संख्या धोकादायक पद्धतीने ओसरत आहे. यासाठी विविध कारणे असून, त्यात लाकडाची तस्करी, चोरटी जंगलतोड, जंगली वणवे, औद्योगिकीकरण, शेती आणि लागवडीसाठी वनजमिन साफ करणे आणि इतर अनेक मानवनिर्मित चुका यांचा समावेश आहे. ९० कोटी लोक जंगलांवर उपजीविकेसाठी अवलंबून आहेत.

विशेषतः, भारतात, आम्ही उच्च दराने वने गमावत आहोत. १९८८ च्या राष्ट्रीय वनधोरणानुसार, भारताची एक तृतियांश जमिनीचे जंगलासोबत सहअस्तित्व हवे. तरीसुद्धा, सध्याच्या घडीला, देशातील जंगलांनी व्याप्त जमीन एकूण व्याप्तीच्या फक्त २४.३९ टक्के आहे. २०१७ मध्ये भारतीय वन सर्व्हेक्षण संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार, वर्षावर्षाला जंगलतोड झपाट्याने वाढत आहे. आमच्या अगदी डोळ्यासमोर जंगले अतिशय वेगाने नष्ट होत आहेत. दोन्ही तेलगू राज्येही यास अपवाद नाहीत आणि वस्तुतः देशापेक्षा जास्त जंगल कमी होण्याच्या प्रमाणास सामोरे जात आहेत.

तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद हिरवे वृक्षारोपण, तळी आणि इतर जलसंस्था यांच्यासह वैविध्यपूर्ण इकोसिस्टीमसाठी प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने, अगदी हे शहरसुद्धा आज जंगलतोडीच्या विळख्यात असून सातत्याने शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे, ६० टक्के झाडझाडोरा गमावला आहे. दुसऱ्या तेलगू राज्यातही हाच प्रकार असून, राज्यातील हिरवाई कमी होत असल्याच्या स्थितीत आहे. जंगलतोड ही केवळ दमा आणि इतर श्वसनाचे विकार आणते, एवढेच नव्हे तर मान्सूनचा मार्ग बदलण्यात आणि लागवड आणि कृषीवर तसेच वनस्पती आणि वन्यप्राण्यांच्या प्रजनन हंगामावर परिणाम करणाऱ्या प्रतिकूल हवामान बदल घडवण्यातील प्रमुख घटक आहेत. जंगलतोड आणि झाडझाडोरा नष्ट झाल्याच्या नकारात्मक परिणामांमुळे इकोसिस्टीममध्ये मोठा बिघाड होत आहे, ज्यामुळे त्यांच्याकडील वन्यप्राण्यांना अन्न आणि पाण्याच्या शोधात स्वतःच्या वस्तीतून बाहेर पडावे लागले आहे. अशा जंगलतोडीमुळे मानवजातीला भेडसावणारी प्राथमिक चिंता ही प्रामुख्याने पाऊस आणि पावसाच्या पाण्याची शेतीसाठी उपलब्धता ही असून, ज्याचा अंतिम परिणाम दुष्काळाने त्रस्त समाज आणि प्राण वाचवणारा प्राणवायूचा अभाव हा आहे.

असे म्हटले जाते की, पूर्ण वाढलेला वृक्ष आपल्याला २४ लाख रूपयांचा प्राणवायू पुरवतो आणि ०.५३ टन कार्बन डायऑक्साईड आणि १.९५ किलो इतर प्रदूषणकारी घटक शोषून घेतो.तो आपल्याला पृथ्वीच्या गाभ्यात असलेले १,४०० गँलन पावसाचे पाणी साठवण्यासही मदत करतो. एखाद्या आरोग्यसंपन्न व्यक्तीला दिवसभराचा लागणारा प्राणवायू तीन सिलिंडर आहे. या दराने, एखाद्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी प्राणवायुची गरज असेल तर, त्याने आपल्या आयुष्यात तीन वृक्ष लावून वाढवले पाहिजेत. मानव मैत्रीपूर्ण आणि सामाजिक म्हणून ओळखला जातो. तरीसुद्धा, मोठा प्रश्न हा आहे की, आमच्या अस्तित्वाचे स्त्रोत असलेल्या वृक्षांप्रति आम्ही किती मैत्रीपूर्ण आणि काळजी घेणारे आहोत?

सामूहिक जबाबदारी..

मानवी अस्तित्वासाठी वृक्षारोपण आणि झाडी असण्याच्या गरजेबद्दल जागृती फैलावण्याच्या एकमेव हेतूने ग्रीन इंडिया चँलेंज अशा संघटना पुढे आल्या आहेत. संघटना प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात किमान तीन वृक्ष लावून त्यांची जोपासना करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देश्याने काम करत असून, त्याद्वारे व्यक्तीला जीवनभर निसर्गाने जो प्राणवायू दिला, त्याबदल्यात निसर्गाचे देणे तो परत करेल, हे पाहते. अशा संघटनांच्या अनेक पुढाकारांमुळे, पर्यावरण आणि वृक्षारोपण संरक्षण ही आता सामाजिक जबाबदारी म्हणून मान्य करण्यात आली आहे.

विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, नोकरशहा जे आयएएस, आयपीएस, आयआरएस पर्यंत मर्यादित नाहीत, राजकारणी आणि क्रीडा, माध्यम, चित्रपट यातील प्रख्यात लोक तसेच सामान्य यांच्या सामूहीक पाठिंब्याने ३.५ कोटी वृक्ष लावण्यात आले आहेत. या सुरेख पुढाकारात सहभाग घेण्यासाठी व्यावसायिक, संस्था असे समाजातील सर्व भागधारक स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. या संस्थेने ३८ देशांत आपले सदिच्छा कार्यचालन पसरवले असून सरकारकडून कोणताही निधी न घेता काम करत आहे. हेच संघटनात्मक कार्यचालनाचा आरसा आहे.

ग्रीन इंडिया चँलेंज सरकार, एनजीओ आणि लोक अशा सर्व भागधारकांना एका मंचावर आणून त्याद्वारे सामूहीक जबाबदारी स्थापित होईल आणि भविष्यात झटपट परिणाम दिसू शकतील. मानवाच्या सुरळीत अस्तित्वासाठी स्वच्छ हवा, जल आणि इतर नैसर्गिक स्त्रोत आम्हाला मिळावेत, या सामायिक उद्दिष्टाच्या दिशेने काम करण्यासाठी सहाय्य करेल.

तेलंगणा सरकारने या दिशेने अगोदरच पाऊल उचलले असून, हरिता हरम कार्यक्रम सुरू केला आहे. आंध्रप्रदेश सरकारही फारसे मागे नाही. आमच्या भल्यासाठी असे पुढाकार यशस्वी ठरतील, हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे. युवक आणि सर्व स्वयंसेवकांना हे कार्यक्रम सामान्य जनतेत नेऊन याबद्दल जागृती करावी, असे आवाहन आहे. जिओ टँगिंग विविध ठिकाणी लावलेल्या वृक्षांची वाढ आणि सुरक्षा यावर देखरेख करण्यात मदत होऊ शकते आणि केवळ लावलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा या पुढाकाराच्या शाश्वततेवर प्रकाश टाकेल. स्थानिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्या समर्थनाने स्थानिक अधिकारी हे वृक्ष दत्तक घेऊ शकतील आणि या सामूहीक उद्देश्यासाठी काम करण्याची वैयक्तिक जबाबदारी घेतील. शहरांमध्ये, आजकाल बेसुमार प्रदूषणाचे अनिष्टाशी लढा देण्यासाठी नवीन बागा आणि वनस्पती लागवड करून त्यांच्या देखभालीसाठी निधीचे वाटप करणे हे अप्रस्तुत ठरेल. कमी वनस्पती जेथे दिसतील, असे भाग निश्चित करावे लागतील आणि खास गोष्ट म्हणून विशिष्ट भागात अधिकाऱ्यांनी अ-वनीकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज आहे.

ज्या विविध संघटना आणि लोक निस्वार्थीपणे या प्रमुख उद्देश्यासाठी काम करत आहेत, अशांना सरकारने पुढे येऊन मान्यता दिली पाहिजे. यामुळे अशा अनेक कंपन्या,संघटनांना या कार्याच्या मोठ्या स्पेक्ट्रममध्ये सक्रीय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. अशा प्रसंगी जागृती कार्यक्रम घेता येतील, जे आजच्या काळाची प्रमुख गरज असलेला संदेशाचा प्रसार करतील. पॉलिथिन पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, जार अशा घरगुती प्लास्टिक वस्तु विनामूल्य रोपांसाठी विनिमय करता येतील ज्यामुळे सामान्य लोकांना या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रेरणा मिळेल.

पर्यावरणीय योद्धे..

जादव मोलु पायेंग, हे आसाममधील जोरहाट या छोट्या शहरातील असून ते आता भारताचे वन मानव म्हणून सर्वांना परिचित आहेत. आपल्या शहराजवळची १,३०० हेक्टर पडिक जमिनीवर एकट्याने झाडे लावून त्यांची जोपासना एकट्याने करण्याच्या अथक कार्यासाठी ते ओळखले जातात. आपल्या आयुष्यातील तीन दशकांपासून ते कसे या कार्यात गुंतले आहेत, हे अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्या शहरातील रहिवासी दुष्काळ, उपासमार आणि विविध आजारांच्या विपरीत परिस्थितीशी लढा देण्यास सहाय्य झाले आहे. ते आता स्वच्छ आणि हरित जीवन जगत आहे.

त्याचप्रमाणे, तेलगु पर्यावरण योद्धे वनजीवी रामय्या हे दोन्ही तेलगु राज्यांसाठी प्रेरणा आहेत. तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यात आणि परिसरात फळे येणारी आणि सावली देणारी झाडे लावण्याच्या उद्देश्याने एक हजार रोपे लावण्यासाठी रामय्या माहिती आहेत. आजही, ८० वर्षे वयातही संधी मिळेल तेव्हा रामय्या झाडे लावू, याची खात्री करतात. रामय्या यांची तपस्या अशी आहे की त्यांची जीवनगाथा राज्य सरकारच्या सहावीत सामाजिक विषयाच्या क्रमिक पुस्तकात धडा म्हणून समाविष्ट केली आहे.

झाड लावणे आणि ते वाढवणे हे आव्हान हरित भारत पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि आम्ही आणि आमच्या भावी पिढ्यांसाठी आपण स्वीकारू या. आमचे जीवनमान आणि कल्याणाचा मुख्य स्त्रोत असलेल्या निसर्गाला त्याचे देणे परत देऊन टाकण्याचा यापेक्षा सर्वोत्कृष्ट मार्ग दुसरा कोणता आहे?

(हा लेख ग्रीन इंडिया चँलेंजचे संस्थापक, एम. करूणाकर रेड्डी यांनी लिहिला आहे.)

हेही वाचा :प्रौढांच्या चुकांमुळे एका पिढीचा जातोय बळी!

ABOUT THE AUTHOR

...view details