महाराष्ट्र

maharashtra

१४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम ठेवा; तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी..

By

Published : Apr 6, 2020, 8:45 PM IST

तेलंगाणा मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केसीआर यांनी १४ एप्रिलनंतर दोन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे.

Telangana CM KCR suggested that the Lockdown should continue even after April 14
१४ जूननंतरही लॉकडाऊन कायम ठेवा; तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी..

हैदराबाद -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. १५ तारखेनंतर हा लॉकडाऊन हटणार का, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. यातच तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे.

तेलंगाणा मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केसीआर यांनी १४ एप्रिलनंतर दोन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. एका सामाजिक संस्थेच्या अहवालानुसार भारतात तीन जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल अशी माहिती समोर आली आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लॉकडाऊन वाढवण्यास सुचवले आहे.

हेही वाचा :'कोविड-19' विरुद्ध लढण्यास 'डीआरडीओ' सज्ज!

ABOUT THE AUTHOR

...view details