रायपूर - देशाच्या रक्षणासाठी आपले घरदार, परिवार सोडून अनेक सैनिक नक्षलवाद्यांशी दोन हात करतात. या दरम्यान काहींना वीरगती प्राप्त होते. 6 एप्रिल रोजी झालेल्या नक्षली हल्ल्यात रायगड जिल्ह्याच्या सोनाजोरी या छोट्याशा गावातील राजाराम एक्का यांना वीरमरण आले होते. या घटनेला दहा वर्षे उलटून गेली. त्यावेळी शासनाकडून विविध मदत जाहीर करण्यात आली होती. पण, आतापर्यंत शासनाची कोणतीच मदत त्यांच्या कुटुंबियांना मिळाली नाही. देशासाठी आपले जीव देणाऱ्या वीर जवानाच्या कुटुंबियांची उपेक्षाच होत आहे.
छत्तीसगढमध्ये सत्तांतर झाले, दहा वर्षांत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या वीर राजाराम परिवाराला शासन आणि प्रशासनाने अनेक आश्वासने दिली होती. पण, त्यापैकी काहीच पुर्ण केले नाहीत. त्यांना कुटुंबियांना मदतीची आजही अपेक्षा आहे. त्याचबरोबर वीर जवानांच्या गावात त्यांच्या नावाने शाळा आणि गावात त्यांच्या पुतळ्याची उभारणी करण्याचीही घोषणा केली होती. ती घोषणा आजपर्यंत घोषणाच राहील्या आहेत.
आश्वासनाच्या खैरातीनंतर शासनाला विसर
वीर जवानाच्या पत्नीने सांगितले, सरकारने आर्थिक सहायता केली. पण, त्यानंतर अनेक वर्षे त्यांना पेंशन मिळाली नाही. हक्काच्या पेंशनसाठीही खूप लढा द्यावा लागला. वीर जवानच्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीही शासनाने घेतली होती. पण, एक वर्षाचा खर्च देत नंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी त्यांची मुलगी फक्त पाच वर्षांचीच होती. राजाराम यांच्या पत्नीने अनुकंपामध्ये नोकरी मिळावी, यासाठी अनेक वेळा शासकीय कार्यालयाची उंबरठे झिजविली. पण, निराशावियतिरीक्त त्यांना काहीच मिळाले नाही. फक्त बस 15 अगस्त आणि 26 जनवरीच्या दिवशी त्यांना बोलविण्यात येते आणि शाल-श्रीफळ देऊन परत पाठविले जाते.
ती भेट शेवटची...