भोपाळ -लोकसभा निवडणुकांसाठी मध्यप्रदेशच्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची वाट पाहत असलेल्या सुमित्रा महाजन यांनी शेवटी निवडणूकच न लढवण्याचा निर्णय केला आहे. तर, आजच्या तारखेपर्यंत अद्यापही पक्षाने उमेदवार दिलेला नाही. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. २०१४ मध्ये सुमित्रा महाजन यांनी या मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.
पक्षामध्ये ताई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमित्रा महाजन यांचा संयम तुटलेला दिसतो. त्यामुळेच त्यांनी शेवटी निर्णय घेऊन निवडणूक न लढवण्याचा निश्चय केलेला दिसतो. त्यांना तिकीट न मिळाल्याचे दुःख मात्र त्यांच्या पत्रातून साफ छळकत आहे. या जागेवरुन उमेदवार देण्यासाठी पक्ष गोंधळात दिसत आहे. पक्षाला या मतदार संघातून उमेदवार देण्यासाठी संकोच होत असावा, असे वाटते. या जागेवरुन उमेदवारी देण्याची जबाबदारी आपण पक्षावर सोपवली होती. मात्र, पक्ष आताही गोंधळातच दिसतो. त्यामुळे मी यंदा निवडणूकच लढवणार नाही. आता पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार निवडावा, असे महाजन यांनी म्हटले आहे.