महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 15, 2019, 1:06 PM IST

ETV Bharat / bharat

तिहार तुरुंगात चिदंबरम यांना कंपनी कोण देणार? स्वामी म्हणाले, सोनिया, थरूर !

स्वामींना मनमोहन सिंह सरकार आणि मोदी सरकारमध्ये आर्थिकदृष्ट्या कोण अधिक चांगले आहे, याविषयी विचारण्यात आले. त्यावर 'मनमोहन सिंह हे अर्थव्यवस्थेचे खरोखरच चांगले जाणकार आहेत. मात्र, ते गप्प राहिले आणि एका बिनडोक महिलेसमोर डोके झुकवत होते.

डॉ. सुब्रमण्यम स्वामी

अयोध्या -राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी शनिवारी २ दिवसीय दौऱ्यासाठी अयोध्येला पोहोचले. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे त्यांनी ज्या पद्धतीने आर्टिकल 370 हटवले, त्यासाठी कौतुक केले. 'अमित शाह यांनी राज्यसभेत बहुमत नसतानाही एक तृतीयांश मते मिळवली. असे यश मिळवणे हे त्यांच्या यशस्वी धोरणांचे फलित आहे,' असे ते म्हणाले.

पी. चिदंबरम यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, सुब्रमण्यम स्वामी यांनी 'चिदंबरम यांनी चुकीचे काम केल्यामुळेच ते तुरुंगात असल्याचे' सांगितले. 'चिदंबरम यांनी हिंदूंना ललकारले होते. त्यांनी हिंदू दहशतवाद देशासाठी धोका निर्माण करत असल्याचे म्हटले होते. आज ते तुरुंगात आहे. चुकीची कामे हिंदूंनी तेली नव्हती. तर, ती चिदंबरम यांनी केली होती. आता सोनिया गांधी आणि शशी थरूरही शर्यतीत आहेत. लवकरच ते चिदंबरम यांना कंपनी देण्यासाठी तुरुंगात जातील,' असे स्वामी म्हणाले.

राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी

हेही वाचा - 'प्रियांका गांधींना का पुढे आणत नाहीत सोनिया,' हा एक मोठा पेच - नटवर सिंह

स्वामींना मनमोहन सिंह सरकार आणि मोदी सरकारमध्ये आर्थिकदृष्ट्या कोण अधिक चांगले आहे, याविषयी विचारण्यात आले. त्यावर 'मनमोहन सिंह हे अर्थव्यवस्थेचे खरोखरच चांगले जाणकार आहेत. मात्र, ते गप्प राहिले आणि एका बिनडोक महिलेसमोर डोके झुकवत होते. या महिलेच्या इशाऱ्याची ते वाट पहात रहायचे, हीच त्यांची कमकुवत बाजू आहे. आज आमचे सरकार आहे. ते चांगले आणि काम करणारे सरकार आहे,' असे स्वामी म्हणाले.

हेही वाचा - समान नागरी कायदा कधी लागू होणार? नक्की काय आहे कायदा..जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details