नवी दिल्ली - नागरिक्तव सुधारणा विधेयकावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी बनली आहे, असे सोनिया गांधी यांनी पक्षाकडून जारी केलेल्या परीपत्रकामध्ये म्हटले आहे.
'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी', सोनिया गांधींची टीका
नागरिक्तव सुधारणा विधेयकावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
सोनिया गांधी
मोदी सरकार आणि त्याचे मंत्री संपूर्ण देशातील तरुण हे अतिरेकी, नक्षलवादी, फुटीरवादी, देशद्रोही असल्याचे सिद्ध करण्यात व्यस्त आहेत. जेव्हा युवाशक्ती जागृत होते. तेव्हा देशात एक नवीन बदल होतो. भाजपचा अंहकार आणि पोलिसांच्या लाठीमाराणे सुरू झालेली ही दडपशाही हा मोदीं सरकाच्या अंताची सुरवात आहे, असे सोनिया गांधी यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.