महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर व्यक्त केला राग, म्हणाले... ;'मोदी वाघाची सवारी करताय' - काश्मीरमध्ये होणार खुनखराबा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर आपला राग व्यक्त केला आहे.

इम्रान खान

By

Published : Oct 18, 2019, 10:45 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर आपला राग व्यक्त केला आहे. काश्मीरमधील नागरिक गेल्या ७५ दिवसांपासून लष्करी वेढ्यामध्ये आहेत. जर काश्मीरमधील लष्कर हटवले तर तिथे मोठा खुनखराबा होण्याची भिती मोदींना आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.


जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ७५ दिवसांपासून मोदी सरकारने वेढा लावला आहे. मोदी वाघाची सवारी करत आहेत. मोदींना वाटते की, लष्कराचा वापर करुन काश्मींरीना शांत करतील. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्हाला लष्कराची गरज नाही, मात्र तुम्हाला काश्मीरींना दहशत दाखवण्यासाठी त्याची गरज आहे, असे त्यांनी पहिल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


जम्मू काश्मीरमधील मानवी हक्काचे होत असलेले भयंकर उल्लंघन जग पाहात आहे. त्यामुळे काश्मीरमधऊन लष्कर हटवले तर तिथे मोठ्या प्रमाणात खुनखराबा होईल, अशी भिती मोदींना आहे. त्यामुळे तिथे लष्कर तैनात ठेवने हाच एक काश्मींरी नागरिकांना नियंत्रीत करण्याचा एकमेव मार्ग आहे, असे इम्रान खान यांनी दुसऱया ट्विटमध्ये म्हटले आहे.


जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या घटनेला ७५ दिवस होत आहेत. या दरम्यान काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. २ ऑक्टोबरला केंद्र सरकारने अनेक नेत्यांची नजरकैदैतून सुटका केली आहे. दरम्यान तेथील फोनसेवादेखील सुरू करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details