महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'देशात येणार आर्थिक त्सुनामी; उद्योगांना वेळीच सावरणे गरजेचे..' - राहुल गांधी लघु व मध्यम उद्योग

काही महिन्यांपूर्वी मी 'नॉन परफॉर्मिंग अ‌ॅसेट्स'चा (एनपीए) मुद्दा उपस्थित केला होता, तर भाजपने माझ्यावर टीका केली होती. मात्र, आता देशातील बँकांची स्थिती पाहता त्या डबघाईला आलेल्या दिसून येत आहे. देशातील लघु-मध्यम उद्योगही उद्ध्वस्त होत आहेत. तर मोठ्या कंपन्याही आर्थिक तणावाखाली आहेत, असे मत राहुल गांधींनी ट्विटरवर व्यक्त केले आहे...

Small, medium enterprises 'destroyed'; had said 'economic tsunami' is coming: Rahul
'देशात येणार आर्थिक त्सुनामी; उद्योगांना वेळीच सावरणे गरजेचे..'

By

Published : Jul 8, 2020, 4:46 PM IST

नवी दिल्ली :देशातील लघु आणि मध्यम उद्योग हे उद्ध्वस्त होत आहेत. यासाठी लवकरच सरकारने काही उपाययोजना नाही केली, तर देशात आर्थिक त्सुनामी येण्याची दाट शक्यता आहे, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

काही महिन्यांपूर्वी मी 'नॉन परफॉर्मिंग अ‌ॅसेट्स'चा (एनपीए) मुद्दा उपस्थित केला होता, तर भाजपने माझ्यावर टीका केली होती. मात्र, आता देशातील बँकांची स्थिती पाहता त्या डबघाईला आलेल्या दिसून येत आहे. देशातील लघु-मध्यम उद्योगही उद्ध्वस्त होत आहेत. तर मोठ्या कंपन्याही आर्थिक तणावाखाली आहेत, असे मत राहुल गांधींनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.

काही महिन्यांपूर्वीच मी आर्थिक त्सुनामी येण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी भाजपने आणि माध्यमांनी माझ्यावर टीका केली, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबतच त्यांनी एनपीएबाबत एक अहवालही दिला आहे, ज्यामध्ये पुढील आर्थिक वर्षात सुमारे ५०० कंपन्या या १.६७ लाख कोटी कर्जात असतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा :न्यायालयाच्या निकालावर पुनर्याचिका दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांचा नकार - पाकिस्तान

ABOUT THE AUTHOR

...view details