नवी दिल्ली - उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी मौलाना साद यांच्या विरोधात हजरत निजामुद्दीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मौलाना सादवर देशद्रोह आणि मनुष्यवधासारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी मौलानाविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिजवी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मरकजचे मौलाना साद यांनी अतिशय निंदनीय काम केले आहे. कोरोच्या पार्श्वभूमीवर हजारो लोकांना एकत्र बोलवून त्यांनी लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे. मौलानाचे हे काम देशविरोधी कारवाईसारखेच आहे, यामुळे आता शेकडो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.