भुवनेश्वर - भारताच्या इतिहासातील १९३० हे महत्त्वपूर्ण वर्ष मानले जाते. कारण, याच वर्षी गांधीजींनी ब्रिटीश सरकारचा जाचक मिठाचा कायदा मोडून काढला. दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर झालेल्या मिठाच्या सत्याग्रहानंतर, देशभरात सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली.
बापूंनी याआधीही, १९२७ मध्ये या प्रांताला भेट दिली होती. रंभा गावातील 'रॉयल रेसिडन्स' या हॉटेलमध्ये बापू आणि इतर नेते राहत होते. यावेळी बापूंनी त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीला, पुस्तकावर स्वाक्षरी देखील दिली होती.
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात मिठाचा वाटा मोलाचा आहे. गांधीजींच्या मते मीठ हा सर्व लोकांना एकत्र आणणारा घटक आहे. कारण जात, धर्म, प्रांत, भाषा किंवा पत काहीही असो, प्रत्येक व्यक्ती ही मीठ खातेच.