महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 27, 2020, 5:02 PM IST

ETV Bharat / bharat

आरएसएस ही भारतामधील दहशतवादी संघटना, डॉ. आंबेडकरांच्या पणतूचा हल्लाबोल

भारतीय संविधानाचे  शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस)  जोरदार हल्लाबोल केला आहे.

राजरत्न आंबेडकर
राजरत्न आंबेडकर

नवी दिल्ली - भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भारतामधील दहशतवादी संघटना असल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये प्रजासत्ताक दिनानिम्मित आयोजित सभेत ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे. याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. संघावर बंदी आणायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला बसून एका साध्वी म्हणाली होती की, जेव्हा सैन्याकडील दारूगोळा आणि बंदूका संपला तेव्हा आरएसएसने तो सैन्याला पूरवला. मग एवढ्या प्रमाणात दारूगोळा आणि बंदूका आरएसएसकडे कोठून आल्या, असा सवाल राजरत्न आंबेडकर यांनी केला. एखाद्या व्यक्तीच्या घरात दारूगोळा सापडला तर त्या व्यक्तीला दहशतवादी ठरवले जाते. तर मग एखाद्या संघटनेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा असेल, तर मग ती संघटना दशतवादी नाही का, असेही आंबेडकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details