नवी दिल्ली - मुंबईतील सीएसएमटीजवळील पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघातात ३ महिलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. तर २९ जण जखमी झाले आहेत. यानंतर काँग्रेसने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे माध्यम प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा राजीनामा मागितला आहे. आज सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास हा पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.