महाराष्ट्र

maharashtra

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही - केंद्रीय गृह मंत्रालय

भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्कारासाठी कायम शिफारसी येत राहतात. मात्र, यामध्ये औपचारिक शिफारस करण्याची कोणतीही गरज नाही. भारतरत्न कोणाला द्यायचा याचा भारत सरकार योग्यवेळी निर्णय घेते, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

By

Published : Nov 19, 2019, 4:57 PM IST

Published : Nov 19, 2019, 4:57 PM IST

Recommendations for Bharat Ratna are received regularly, but no formal recommendation for this award is necessary says MHA in Lok Sabha

नवी दिल्ली -स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी महाराष्ट्र भाजप वारंवार करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणाही केली होती. हाच मुद्दा लोकसभेमध्ये मांडला असता, यासाठी कोणत्याही औपचारिक मागणीची गरज नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्कारासाठी कायम शिफारसी येत राहतात. मात्र, यामध्ये औपचारिक शिफारस करण्याची कोणतीही गरज नाही. भारतरत्न कोणाला द्यायचा याचा भारत सरकार योग्यवेळी निर्णय घेते, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, शिवसेनेने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे महाराष्ट्रात भाजप सत्तेमध्ये येऊ शकली नाही. दुसरीकडे शिवसेना सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसने वेळोवेळी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला आहे. मात्र, शिवसेना याबाबत काँग्रेसचे मन वळवण्यात यशस्वी होईल असे मत सावरकरांचे नातू रणजीत यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते.

हेही वाचा :'इंदिरा गांधीही वीर सावरकरांच्या अनुयायी होत्या'

ABOUT THE AUTHOR

...view details