नवी दिल्ली - कोरोना विषाणू प्रकरणी सार्क देशांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित चर्चासत्रामध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीर प्रकरण उपस्थित केले होते. त्यावरून पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. एका मानवतावादी व्यासपीठाचा पाकिस्तानने नेहमीप्रमाणे गैरवापर केला, असे रविश कुमार म्हणाले.
'सार्क देशांचे चर्चासत्र हे कोरोना महामारीवर उपाययोजना करण्यासाठी आयोजित केले होते. मात्र, मानवतावादी व्यासपीठाचा पाकिस्ताने गैरवापर केला, असे रविश कुमार म्हणाले. चर्चासत्रामध्ये मोदींनी केलेल्या घोषणावर काम सुरू आहे. आकस्मिक निधीही उभारण्यात येत आहे. तसेच ईराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आण्यात येत आहे, असेही रविश कुमार यांनी सांगितले.