महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'पुन्हा 'पुलवामा' झाल्यास हल्लेखोरांना परिणाम भोगावे लागतील' - वायुसेना प्रमुख राकेश कुमार भदौरिया न्यूज

पुन्हा पुलवामासारखा हल्ला करण्याचा प्रयत्न जरी झाला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास वायुसेना सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया वायुसेना प्रमुख राकेश कुमार भदौरिया यांनी दिली. मागच्यावर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मद या संघटनेने आत्मघातकी हल्ला केला होता.

Rakesh Kumar Singh Bhadauria
वायुसेना प्रमुख राकेश कुमार भदौरिया

By

Published : Feb 27, 2020, 9:47 AM IST

श्रीनगर: भारत-पाकिस्तानदरम्यान असलेल्या नियंत्रण रेषेजवळ पुन्हा पुलावामासारखे हल्ले झाले तर हल्लेखोरांना त्याचे परिणाम सहन करावे लागतील, अशी प्रतिक्रिया वायुसेना प्रमुख राकेश कुमार भदौरिया यांनी दिली. बालाकोट हवाई हल्ल्याला बुधवारी(26 फेब्रुवारी) एक वर्ष पूर्ण झाले. त्या पूर्वसंध्येला श्रीनगरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

गुप्तहेर खात्यांच्या मदतीने वायुसेनेने नियंत्रण रेषेजवळ होणाऱ्या कारवाया रोखण्यासाठी रणनीती तयार केली आहे. बालाकोटच्या वेळीही गुप्तहेर खात्याच्या मदतीनेच योजना यशस्वी झाली होती. पुन्हा पुलवामासारखा हल्ला करण्याचा प्रयत्न जरी झाला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास वायुसेना सज्ज आहे, असे भदौरिया म्हणाले.

हेही वाचा -भारत चीनच्या मदतीला; १५ टन वैद्यकीय साहित्य घेऊन विमान रवाना

मागच्यावर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मद या संघटनेने आत्मघातकी हल्ला केला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवानांना वीरमरण आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details