महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'विद्यार्थ्यांची मन की बात ऐका'; जेईई व नीट परीक्षांबाबत राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

येत्या १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत जेईई आणि १३ सप्टेंबरला 'नीट' परीक्षा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय चाचणी संस्थे(एनटीए)ने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारने या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी मागणी करणारे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

By

Published : Aug 23, 2020, 12:59 PM IST

Rahul Gandhi
राहुल गांधी

नवी दिल्ली - सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय वैद्यकिय पात्रता परीक्षांबाबत (नीट) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे. विद्यार्थी नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत, त्यांची 'मन की बात ऐका', असे गांधी यांनी सुनावले आहे.

येत्या १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत जेईई आणि १३ सप्टेंबरला नीट परीक्षा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय चाचणी संस्थे(एनटीए)ने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारने या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी मागणी करणारे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

शनिवारी आम आदमी पक्षा(आप)चे नेते आणि दिल्लीचे शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांनी देखील केंद्र सरकारकडे प्रवेश आणि पात्रता परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. परीक्षांच्या नावाखाली सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहे. सरकारने परीक्षा रद्द करून यावर्षी प्रवेशासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी, असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.

दरम्यान, १७ ऑगस्टला सर्वोच्च न्यायलयाने जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मास्क आणि ग्लोव्हज पुरवले जातील व सॅनिटायजेशनचीही काळजी घेतली जाईल, असे आश्वासन एनटीएने दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details