महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशातील पुरग्रस्तांना मदत करा; प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन - Assam flood news

आसाममध्ये पूर परिस्थीती गंभीर बनली असून आज आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पुरामुळे राज्यातील 24 जिल्ह्यातील 24 लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. यावर्षी राज्यात पुरामुळे आणि दरड कोसळल्याने 111 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

By

Published : Jul 21, 2020, 1:09 PM IST

नवी दिल्ली - उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातील आसामला पुराचा जोरदार फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. यामुळे लाखो लोकांचा जीव धोक्यात आला असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण प्रसंगी असहाय्य नागरिकांना मदत करण्याचे आवाहन काँग्रेस नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केले आहे.

बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाममधील अनेक भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटाचा लाखो लोकांवर परिणाम झाला आहे. पुरामुळे अडचणी सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या अडचणी सापडलेल्या लोकांना शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन मी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना करते, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी पुरात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना केले होते. दरम्यान, राजस्थामधील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे.

आसाममध्ये पूर परिस्थिती गंभीर बनली असून आज आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पुरामुळे राज्यातील 24 जिल्ह्यातील 24 लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. यावर्षी राज्यात पुरामुळे आणि दरड कोसळल्याने 111 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 85 जणांचा पुरात तर 26 जणांना दरड कोसळल्यामुळे किंवा इतर आपत्तीत सापडल्याने मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details